यंदाची आयपीएल ही विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी नक्कीच फायद्याची ठरेल असे मत भारताचा माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण याने व्यक्त केले आहे.
काल कामाचे व्यवस्थापन (वर्कलोड मॅनॅजमेन्ट) या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात तो बोलत होता. लक्ष्मणच्या मते, “आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू हे उत्तम प्रतीचे क्रिकेटर्स आहेत, आणि आयपीएल सारखी स्पर्धा ही जेव्हा ते विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होतील तेव्हा त्यांना आपल्या लयीत राहण्यासाठी मदत करेल.”
तो पुढे म्हणाला, “पण फिटनेसच्या बाबतीत सुद्धा त्यांनी समजूतदारपणा आणि कुशलता दाखवली पाहिजे. आपल्या संघाचे नेतृत्व आणि प्रवास यांची योग्य सांगड घातली पाहिजे.
विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल ही महत्वाची मानली जाते आणि त्यासाठी खेळाडूंनी वर्कलोड बरोबरच पुढचे २ महिने दुखापत होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे.”
पुढे लक्ष्मण म्हणाला, ‘विश्वचषक हा प्रत्येक संघासाठी खूप महत्वाचा असतो आणि मला वाटते यंदाचा विश्वचषक भारतीय संघाने जिंकावा. मला माहित आहे सगळेच खेळाडू खूप हुशार आहेत आणि आयपीएलचा फायदा ते नक्कीच चांगला करून घेतील कारण प्रत्येक संघ हा खूप मजबूत आहे आणि विश्वचषकाअगोदर मजबूत संघाविरुद्ध खेळणे म्हणजे एकप्रकारे विश्वचषकाची तयारी आहे.’
लक्ष्मण हा सनराईजर्स हैदराबादचा सल्लागार असून तो पुढे म्हणला, डेविड वॉर्नरच्या येण्याने संघात आनंदाचे वातावरण आहे.
केपटाउन येथे कसोटीत वॉर्नर आणि स्मिथला चेंडू छेडछाड प्रकरणी एका वर्षाची बंदी घातली होती.
“डेविड वॉर्नर हा आयपीएलच्या या मोसमासाठी खूप उत्सुक दिसत आहे. चेंडू छेडछाड प्रकरण विसरून तो सनराईजर्स हैदराबाद संघासाठी निश्चितच चांगला क्रिकेट खेळेल. ” ईडन गार्डन्स येथे सुरु असलेल्या सराव शिबिरानंतर बोलताना लक्ष्मण म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
–एकाच सामन्यात सारखाच पराक्रम करण्यासाठी विराट कोहली, सुरेश रैनामध्ये चुरस
–उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या आठ संघाचे हे आहेत कर्णधार…
–अबब!! २५ चेंडूत शतक, ते ही २० वर्षीय खेळाडूने केले, पहा व्हिडिओ