भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन हे दोघेही १६ मार्च २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले होते. ही गोड बातमी त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यानंतर नुकताच संजनाने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर बुमराहने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. बुमराहने दिलेली मजेशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराहने इंग्लंड विरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. त्यांनतर त्याने गोवामध्ये संजनासोबत विवाह केला होता. आता तो मुंबई इंडियन्स संघासोबत आगामी आयपीएल स्पर्धेसाठी सराव करत आहे.
त्याची पत्नी संजनाने, आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतचा अतिशय सुंदर फोटो शेअर केला. ज्यामध्ये तीने सूर्यास्ताच्या वेळी समुद्राच्या पाण्यात उभे राहून फोटो क्लिक केला आहे. तसेच तिने या फोटोला छान असे कॅप्शनही दिले आहे. ‘आयुष्यभराच्या आठवणी आणि मग काही..,’ असे लिहिले आहे.
या अप्रतिम फोटोवर बुमराहने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की, “ज्याने कोणी हा फोटो क्लिक केला असेल, तो वास्तवात खरंच चांगला आहे.” या मजेशीर प्रतिक्रियेला प्रतिसाद देत संजनाने चाहत्यांचे मन जिंकत लिहिले की, “हेच कारण आहे, म्हणून मी त्याच्यासोबत लग्न केलं आहे.” या मजेशीर प्रतिक्रियांना चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.
यापूर्वी देखील बुमराह-संजना या नवविवाहित जोडीचे लग्न, संगीत आणि रिसेप्शन सोहळ्यातील फोटोज् सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. बुमराहने संजना हिच्यासोबत गोवा ध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह केला होता. मुख्य बाब म्हणजे विवाह सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या मंडळींवर मोबाईल वापरण्यास निर्बंध लावण्यात आले होते. तसेच हा विवाह होण्यापूर्वी कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
पंतने धोनीसारखं बनण्याचा प्रयत्न करू नये; माजी भारतीय यष्टीरक्षकाने दिला सल्ला
विश्वचषकात आजपर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केलेले ७ कर्णधार व त्यांची कामगिरी
पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषकासाठी भारतात येऊ शकतो का? पाहा काय म्हणतेय बीसीसीआय