चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी ही खूप निराशाजनक बातमी आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर काढण्यात आले आहे. निवड समितीने बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात समाविष्ट केले आहे. दुखापतीमुळे बुमराह खेळू शकणार नाही अशी ही दुसरी आयसीसी स्पर्धा असेल. यापूर्वी, पाठीच्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियात झालेल्या 2022 च्या टी-20 विश्वचषकालाही मुकला होता. ज्यामुळे अखेर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.
टीम इंडियाने वरुण चक्रवर्तीचाही संघात समावेश केला आहे. सुरुवातीला हंगामी संघात स्थान मिळालेल्या यशस्वी जयस्वालची जागा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती घेईल. यशस्वी जयस्वाल हा भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेचा एक भाग आहे. तो पहिल्या सामन्यात खेळला पण त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. यानंतर त्याला दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही.
🚨 JASPRIT BUMRAH RULED OUT OF CHAMPIONS TROPHY 2025 🚨 pic.twitter.com/vBUIrDQ90b
— Johns. (@CricCrazyJohns) February 11, 2025
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आठही संघांना त्यांचे अंतिम 15 खेळाडू सादर करण्यासाठी 11 फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित केली होती. यानंतर, कोणत्याही बदलांसाठी संघांना स्पर्धेच्या तांत्रिक समितीची मान्यता घेणे आवश्यक असेल. बीसीसीआयने जानेवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यावेळी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहचा बॅक-अप म्हणून हर्षित राणाला संघात समाविष्ट करण्यात आले होते. यानंतर, राणाने नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एकदिवसीय पदार्पण केले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, 2025 साठी भारताचा सुधारित संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रिषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
हेही वाचा-
तिसऱ्या वनडेत कोण मारणार बाजी? भारत व्हाईटवॉश करणार की इंग्लंड मान राखणार?
विराट कोहलीवर ख्रिस गेलचे मोठे वक्तव्य! म्हणाला, तो अद्याप सर्वोत्तम….
भारताच्या विजयाने ICC क्रमवारीत होईल मोठा बदल, इंग्लंडसमोर प्रतिष्ठेचा प्रश्न!