राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात, राजस्थान रॉयल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात क्रिस मॉरिसने षटकार मारत राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला. यासोबतच गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जयदेव उनाडकटला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामना झाल्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजीबद्दल भाष्य केले आहे.
जयदेव उनाडकटने या सामन्यात महत्वाचे ३ गडी बाद करून राजस्थान रॉयल्स संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर तो म्हणाला की, “आता मी हे बोलू शकतो की, माझ्याकडे कठीण परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. माझ्यासाठी हे एक प्रकारचे पुनरागमनच होते. मला नवीन चेंडूने ज्याप्रकारे गोलंदाजी करायची होती, त्याप्रकारे स्वतंत्रपणे गोलंदाजी मला करता आली. मागच्या हंगामात मला असे करता येत नव्हते. परंतु यावेळेस मला एक पाऊल पुढे टाकावे लागले आहे. मला माहीत होते की, मला केव्हा संधी मिळणार आहे आणि मिळालेल्या संधीचे मी सोनेही केले.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “हा संपूर्ण खेळ कठीण लेंथवर हिट करण्याचा होता. हे सर्व याच खेळपट्टीवर होत होते. खेळपट्टीवर ओलावा जाणवत होता, ज्याचा आम्ही पुरेपुर वापर केला.”
गतवर्षी लग्नबंधनात अडकलेला उनाडकट वैवाहिक जिवनानंतरचा अनुभव सांगताना म्हणाला, “तुम्ही जर माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलत असाल; तर एक व्यक्ती म्हणून ही गोष्ट तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकते. हा खूप सेटल्ड आणि शांत अनुभव आहे. यापेक्षा आणखी उत्तम काय असू शकते की, तुम्ही पत्नीला मिठी मारून मैदानात येता आणि अशा संघ सहकाऱ्यांमध्ये येऊन बसतात जे तुमच्यावर पूर्ण विश्वास दाखवतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी तो धोनीच! ‘माही’च्या स्टाईलमध्ये पंतचा फलंदाजाला यष्टीचीत करण्याचा प्रयत्न अन्.., बघा व्हिडिओ
पैसा वसूल! ख्रिस मॉरिसचा ‘नो लूक षटकार’, तोही रबाडाच्या चेंडूवर; एकदा Video पाहाच
एका बाजूने विकेट्स जात असताना रिषभबरोबर अर्धशतकी भागिदारी करणारा ‘तो’ आहे तरी कोण? वाचा