सोमवारी (दि. 1 मे) विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणाचे प्रकरण आता संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामध्ये भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनीही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इथपर्यंत म्हटले की, झाल्या प्रकारावर मोठी कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अशाप्रकारच्या घटना पुढे होणार नाहीत. विराट आणि गंभीरला अशाप्रकारे भांडताना पाहून गावसकर खूपच निराश झाले.
काय म्हणाले गावसकर?
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी यावेळी इशाऱ्यामध्ये स्पष्ट म्हटले की, कठोर शिक्षेत काही सामन्यांसाठी निलंबित करण्याचाही समावेश आहे. जेणेकरून हे निश्चित केले जाऊ शकले की, अशाप्रकारच्या घटना भविष्यात केल्या जाणार नाहीत. त्यांनी असेही म्हटले की, टीव्ही ब्रॉडकास्टिंगने खेळाडूंना आणखी आक्रमक करण्याची भूमिका निभावली आहे.
गावसकर म्हणाले की, जेव्हा ते भारतासाठी क्रिकेट खेळायचे, तेव्हाही स्लेजिंग व्हायची. मात्र, अशाप्रकारे मर्यादा कधीच ओलांडल्या जात नव्हत्या, ज्याप्रकारे सोमवारी लखनऊमध्ये करण्यात आल्या.
या घटनेनंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांनी सामना शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला. सोमवारी (दि. 1 मे) लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्यानंतर विराट आणि गंभीर यांच्यात बाचाबाची झाली, जी टीव्ही कॅमऱ्यांमध्ये कैद झाली. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर आयपीएलने कारवाई करत सामन्याचे संपूर्ण शुल्क कापले.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावसकर म्हणाले की, “मी काही वेळापूर्वीच हे पाहिलं. मी हा लाईव्ह सामना पाहिला नव्हता. या सर्व गोष्टी कधीच चांगल्या वाटल्या नाहीत. 100 टक्के सामना शुल्क काय असते? वास्तवात 100 टक्के सामना शुल्क काय असते? जर तो विराट कोहली आहे, तर त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 17 कोटी रुपये मिळतात. याचा अर्थ असा की, 17 कोटी जवळपास 16 सामन्यांसाठी. यामध्ये उपांत्य आणि अंतिम सामन्याचाही समावेश आहे. त्यामुळे तुम्ही एक कोटी रुपयाबाबत बोलत आहात. तेव्हा त्याला 1 कोटी रुपयांचा दंड लागेल? हा खूप मोठा दंड आहे का?”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, “मला माहिती नाही की, गंभीरची स्थिती काय आहे. बोर्डाने हे निश्चित केले पाहिजे की, अशा घटना पुन्हा झाल्या नाही पाहिजेत. तुम्ही ही अपेक्षा करत आहात की, अशा घटना पुन्हा होणार नाहीत. कारण, हे खूप खूप मोठा दंड आहे. तुम्हाला मोठा सामना खेळायचा आहे. प्रतिस्पर्ध्याशी खेळायचे आहे. जेव्हा आम्ही खेळायचो, तेव्हा आपसात बाचाबाची व्हायची, पण आम्ही आता जे पाहिलं, त्याप्रकारचं कधीच वागलो नव्हतो. याचा संबंध याच्याशीही आहे की, सर्व काही टीव्हीवर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटते की, तुम्ही टीव्हीवर आहात, तर तुम्ही जरा जास्तच असे करता.”
गावसकरांचे मोठे वक्तव्य
यावेळी गावसकरांनी मोठे वक्तव्य करत असेही म्हटले की, “तेव्हा माझे मत असे आहे की, असे काही करा, ज्यामुळे हे निश्चित होईल की, अशा गोष्टी पुन्हा होणार नाहीत. ज्याप्रकारे 10 वर्षांपूर्वी हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यात झाले होते. तुम्हाला त्यांना असेही म्हणावे लागले तरी चालेल की, काही सामन्यांसाठी बाहेर बसा. तुम्ही हे निश्चित केले पाहिजे की, अशाप्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत. काही असे, ज्यामुळे संघाचे नुकसान होईल. ही असते कठोर शिक्षा.”
खरं तर, या सर्वाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि लखनऊचा खेळाडू नवीन उल हक (Naveen ul Haq) यांच्यात बाचाबाची झाली होती. लखनऊ संघ 127 धावांचे आव्हान पार करू शकला नाही आणि बेंगलोरने 18 धावांनी सामना जिंकला. सामन्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांशी हाथमिळवणी करत होते. त्यावेळीही विराट कोहली आणि नवीन उल हक (Virat Kohli And Naveen ul Haq) यांच्यात भांडण झाले. यानंतर गंभीरने लखनऊचा फलंदाज काईल मेयर्सला विराटपासून दूर नेले. त्यानंतर प्रकरण आणखीच तापले होते. (legend sunil gavaskar wants stricter punishment for virat kohli and gautam gambhir)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलने वाढवलं BCCIचं टेन्शन! दुखापतीवर आली मोठी अपडेट, कृणाल पंड्या करणार लखनऊचे नेतृत्व
‘तू माझ्या कुटुंबाला शिवी दिली’, विराट आणि गंभीरमध्ये काय बाचाबाची झाली? एका क्लिकवर घ्या जाणून