भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. जिथे त्यांना 4 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये काही नवे चेहरे पाहायला मिळाले आहेत. तर बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत संघाचा भाग असलेल्या काही खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. या मालिकेत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे राहणार आहे. त्याचवेळी बीसीसीआयकडून या मालिकेसाठी मयंक यादव आणि रायन पराग यांच्याशिवाय शिवम दुबेची संघात निवड का करण्यात आली नाही याची माहिती देण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी संघाची घोषणा करताना बीसीसीआयने सांगितले की, मयंक यादव आणि शिवम दुबे हे दोन्ही खेळाडू दुखापतीने त्रस्त असल्याने निवडीसाठी उपलब्ध नाहीत. रियान परागबाबत बीसीसीआयने माहिती दिली की, तो सध्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये असून खांद्याच्या दुखापतीतून तो सावरत आहे. शिवम दुबे बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी संघाबाहेर होता. तर मयंक यादव आणि रियान पराग या टी20 मालिकेत खेळले होते, त्यानंतर ते आता दुखापतीमुळे बाहेर आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा भाग असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड झाली नाही. आता यश दयालचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामागील सर्वात मोठे कारण मयंक यादवला वगळण्यात आले आहे. या टी20 मालिकेसाठी अक्षर पटेललाही टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अविनाश खान. यश दयाल
हेही वाचा-
IND vs NZ: टीम इंडिया अडचणीत, पुणे कसोटीसह मालिका गमावण्याचा धोका?
IND vs NZ: भारताला लाज वाचवायची असेल तर 16 वर्षांच्या या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल
Emerging Asia Cup; सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तानकडून भारताचा दारुण पराभव