---Advertisement---

फायनल हारलेल्या टीम इंडियाला विराट, सचिन, रिचर्ड्ससह या दिग्गजांनी दिला खास संदेश…

On: सोमवार, मार्च 9, 2020 5:56 PM
---Advertisement---

काल (8 मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी जिंकला आणि पाचव्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले.

या पराभवानंतरही भारतीय महिला संघाला अनेक आजी-माजी खेळाडूंकडून पाठिंबा मिळत आहे. यामध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, विराट कोहली, गौतम गंभीर, व्हीव्हीयन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर यांनी भारतीय संघाची पाठराखण केली आहे.

भारतीय संघाने महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच प्रवेश केला होता. परंतू पहिल्या प्रयत्नात यश मिळवण्यात त्यांना अपयश आले. या पराभवानंतर भारतीय संघ निराश झालेला दिसून आला.

पण पराभव झाला असला तरी तूमचा अभिमान आहे, असा अनेक दिग्गजांनी भारतीय संघाला संदेश दिला आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत म्हटले आहे की ‘संपूर्ण टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने केलेल्या प्रयत्नांचा अभिमान आहे. मला खात्री आहे की तूम्ही मुली पूर्वीपेक्षा आणखी ताकदीने पुनरागमन कराल.’

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन करताना भारतीय संघाचेही कौतुक केले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘ऑस्ट्रेलिया संघाचे टी20 विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन. भारतीय संघासाठी हा कठीण दिवस होता. आपला संघ तरुण आहे आणि हा संघ एक चांगला संघ म्हणून पुढे येईल. तूम्ही जगातील अनेकांना प्रेरणा दिली आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे. मेहनत करत रहा आणि आशा कायम ठेवा. एकदिवस चांगले नक्की घडेल.’

वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी भारतीय महिला संघासाठी ट्विट केले आहे की ‘“कधीही निराश होऊ नका. तुम्ही विश्वचषकात उत्कृष्ट खेळ केला आहे आणि एक दिवस विश्वचषक नक्की तुमच्याकडे असेल. स्वत:वर विश्वास ठेवा!”

तसेच भारताची अनुभवी फलंदाज मिताली राजने म्हटले आहे की ‘आजच्या निकालामुळे निराश झाले. तथापि मुलींसाठी ही स्पर्धा चांगली ठरली. मी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि संघाचे अभिनंदन करते. तसेच महिला क्रिकेटला पाठिंबा देत रहा अशी सर्वांना विनंती करते. आता केवळ चांगल्याच गोष्टी पुढे होणार आहेत.’

अन्य आजी-माजी खेळाडूंनी भारतीय संघाचे केलेले कौतुक – 

महत्त्वाच्या बातम्या – 

वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाचे झाले भारतात आगमन

…तरच धोनीचे होऊ शकते टीम इंडियात पुनरागमन

उपविजेत्या भारतीय महिला संघाबद्दल सर व्हिव्हिअन रिचर्ड्स म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---