शारजाह| आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला पाच गडी राखून पराभूत केले. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.
शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 17 धावांची गरज होती. यावेळी ड्वेन ब्रावोचे एक षटक बाकी असताना देखील चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने फिरकीपटू रवींद्र जडेजाला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर सामन्यानंतर बरीच टीका झाली. कारण या षटकात जडेजाने तब्बल 22 धावा दिल्या. दिल्लीचा अष्टपैलू अक्षर पटेलने या षटकात 3 षटकार लगावले, ज्यामुळे दिल्लीने हा सामना सहज जिंकला.
पण सामन्यानंतर धोनीने जडेजाला शेवटच्या षटकात गोलंदाजी देण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
ब्राव्हो नव्हता तंदुरुस्त
सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला, “ब्राव्हो तंदुरुस्त नसल्यामुळे तो मैदानात परत येऊ शकत नव्हता. याच कारणामुळे मी जडेजाला शेवटच्या षटकात गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. फिरकीपटू कर्ण शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोघांचे षटक शिल्लक होते आणि मी जडेजाची निवड केली.”
धवनची विकेट होती महत्वाची
दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने 58 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी केली. याबद्दल बोलताना धोनी म्हणाला, “आम्ही शिखरला काही संधी दिल्या. आमच्या खेळाडूंनी त्याचे झेल सोडले. जोपर्यंत तो खेळपट्टीवर उभा होता, त्याने दिल्लीच्या धावगतीमध्ये सातत्य राखले. त्याची विकेट खूप महत्वाची होती.”
धवनने केली चांगली फलंदाजी
“माझ्या मते पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात खेळपट्टीमध्ये बदल झाला होता. दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. पण एकंदरीत धवनकडून आपण श्रेय घेऊ शकत नाही. त्याने चांगली फलंदाजी केली आणि इतर खेळाडूंनीही त्याला उत्तम साथ दिली,” असेही धोनी म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: जेव्हा पंत, स्टॉयनिसने काढली रिकी पाँटिंगची खोड, पुढे काय झालं पाहा
सुपरमॅनने करून दाखवलं! राजस्थानच्या हातून विजय खेचून आणणाऱ्या डिविलिअर्सचे ट्विटरवर जोरदार कौतुक
ट्रेंडिंग लेख –
-यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
-आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण
-आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा एन्रीच नॉर्किए आहे तरी कोण?