रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर सामना शार्दुल ठाकूरच्या शतकामुळे चर्चेत आहे. या दरम्यान कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत झालेल्या एका विचित्र घटनेमुळे मुंबईचा हा सामनाही चर्चेत आला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेला कन्हैया वाधवानने झेलबाद केले. त्यानंतर त्याला बाद घोषित करण्यात आले. पुढचा फलंदाज शार्दुल ठाकूर मैदानावर आला होता. पण त्यानंतर तिसऱ्या पंचांनी रहाणे ज्या चेंडूवर बाद झाला तो नो-बॉल असल्याचे सांगितले.
ही घटना मुंबईच्या दुसऱ्या डावाच्या दुसऱ्या दिवशीच्या 25 व्या षटकात घडली. जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमर नझीरने एक शॉर्ट बॉल टाकत अजिंक्य रहाणेला फसवले. आणि चेंडू बॅटच्या कडेला लागला त्यानंत चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला, बाद झाल्यामुळे रहाणे चालत ड्रेसिंग रूममध्ये गेला होता. पण पंच अजूनही नो-बॉल तपासण्यात व्यस्त होते. काही वेळाने, तिसऱ्या पंचांनी कळवले की उमर नझीरचा पाय पांढऱ्या रेषेच्या पलीकडे गेला होता. त्यामुळे रहाणेला बाद करणारा चेंडू नो-बॉल घोषित करण्यात आला.
अजिंक्य रहाणे जेव्हा क्रीजवर परतला तेव्हा ग्राउंड पंचांनी त्याला सांगितले की त्यांनी मुंबईच्या कर्णधाराला थांबण्यास सांगितले होते. परंतु त्याने ऐकले नाही. अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूरला पुन्हा पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले.
Ajinkya Rahane was given Out and he left ground and umpires called him back from dug out and Shardul was in the ground and sent back to the dressing room. Have you ever seen that a player called from dug out after he left field. #RanjiTrophy #AjinkyaRahane @BCCIdomestic @BCCI pic.twitter.com/LH3a8vtilo
— Manoj Yadav (@csmanoj21) January 24, 2025
पहिल्या डावात मुंबईचा संघ फक्त 120 धावांवर बाद झाला. ज्याच्या प्रत्युत्तरात जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात 206 धावा केल्या. ज्यामुळे संघाने 86 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात मुंबईने 91 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या, अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूरने विरोधी गोलंदाजांवर प्रतिहल्ला करत जबरदस्त शतकी खेळी खेळली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस ठाकूरने 113 धावा केल्या. त्याच्यासोबत तनुश कोटियन देखील 58 धावांवर नाबाद खेळत आहे. या दोघांनी 173 धावांची भागिदारी करत मुंबईला संकटातून बाहेर काढले आहे. आता मुंबईकडे एकूण आघाडी 188 धावांची झाली आहे.
हेही वाचा-
ind vs eng; सामन्याच्या एकदिवसाआधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, स्टार खेळाडूची एंट्री!
रोहित-रहाणे फ्लाॅप, शार्दुल ऑन टाॅप, लाॅर्ड ठाकूरची दमदार शतकी खेळी, मुंबई संकटातून बाहेर
रवींद्र जडेजाची रणजी ट्राॅफीत कहर कामगिरी, ठरला सामनावीरचा मानकरी, संघाचा एकतर्फी विजय