आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (icc under 19 cricket World Cup) स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यांना मंगळवार पासून (१ फेब्रुवारी ) सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये उपांत्य फेरीतील दुसरा सामना बुधवारी (२ फेब्रुवारी) पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यापूर्वी भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे संघाबाहेर असलेला निशांत सिंधू (Nishant Sindhu) आता पूर्णपणे फिट आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या महत्वाच्या सामन्यापूर्वी तो उपलब्ध असणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार यश धूल संघाबाहेर असताना, निशांत सिंधूने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तो संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. तसेच युगांडा विरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर त्याची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली होती.
याबाबत अधिक माहिती असणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “निशांत सिंधूची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी सर्व खेळाडू निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध असणार आहेत. ४ वेळेस विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाने सराव सामन्यात पराभूत केले होते.
बांगलादेशला पछाडत भारतीय संघाने गाठली उपांत्यफेरी
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाला अवघ्या १११ धावा करण्यात यश आले होते. बांगलादेश संघाकडून मेहरोबने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करताना अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. हे आव्हान भारतीय संघाने ३१ व्या षटकात पूर्ण केले होते. यासह भारतीय संघाने २०२० मध्ये झालेल्या पराभवाचा बदला देखील घेतला होता.
महत्वाच्या बातम्या :
“‘माझी धोनीबद्दल नाही, तर बीसीसीआयबद्दल तक्रार आहे”
‘या’ कारणामूळे स्टार्कने घेतली मेगा लिलावातून माघार; म्हणाला…
रोहित अँड कंपनी अहमदाबादमध्ये दाखल, ‘इतके’ दिवस खेळाडू राहाणार क्वारंटाईन