इंडियन प्रीमियर लीग (IPL) (आयपीएल) ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आतापर्यंत १४ हंगाम खेळले गेले आहेत. तर १५ वे हंगाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. बीसीसीआय (BCCI) सध्या २०२३ पासून ते २०२७ पर्यंतचे मीडिया हक्क विकण्याच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान यावेळी बीसीसीआयला दुप्पट रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे यामागचे कारण? चला जाणून घेऊया.
आयपीएल २०२२ स्पर्धेत ८ नव्हे तर १० संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. आगामी हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सामन्यांची संख्या देखील वाढणार आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएल २०२३ मध्ये ७४, २०२४ आणि २०२५ मध्ये ८४-८४, २०२६ आणि २०२७ मध्ये ९४-९४ सामने आयोजीत करू शकते. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर, ६० सामन्यांचे आयोजन केले गेले होते.
हेच कारण आहे की, आगामी हंगामांमध्ये सामन्यांची संख्या दीड पटीने वाढणार आहे. त्यामुळे बीसीसीआय मीडिया हक्क विकून बक्कळ पैसा कमावू शकते. २०१८- २०२२ पर्यंतच्या मीडिया हक्काबद्दल बोलायचं झालं तर, स्टार इंडियाने १६, ३४७.५ कोटी रुपयांत आयपीएलचे मीडिया हक्क खरेदी केले होते. यावेळी अनेक दिग्गज मंडळी मीडिया हक्क खरेदी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
खेळाडूंवरील ताण आणखी वाढणार
आयपीएल स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार म्हणजे खेळाडूंवरील ताण आणखी वाढणार. कारण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएल स्पर्धेत देखील खेळावे लागेल. आयसीसीने २०३१ पर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्यामध्ये अनेक मोठ मोठ्या स्पर्धा आहेत. यात सकारात्मक बाब म्हणजे खेळाडूंच्या कमाईत वाढ होणार आहे.
आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर अनेक देशांमध्ये टी२० लीग स्पर्धांचे आयोजन केले जाऊ लागले आहे. यात कमाई भरपूर होत आहे. परंतु याचा परिणाम वनडे आणि कसोटी क्रिकेटवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण खेळाडू कसोटी आणि वनडे क्रिकेटपेक्षा टी२० क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
धोनीमुळे घडला ‘सलामीवीर’ रोहित, आता रोहितमुळे घडणार ‘हा’ फलंदाज; विंडीजविरुद्ध मिळणार नवी जबाबदारी
आनंद गगनात मावेना! टीम इंडियाचे किट मिळताच दीपक हुड्डाकडून आनंद व्यक्त, पाहा फोटो