आयसीसी टी20 विश्वचषकामध्ये पुरूष क्रिकेट संघांचा आठवा हंगाम खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या या हंगामात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सुपर 12चा 35वा सामना खेळला गेला. हा सामना भारताने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 5 धावांनी जिंकला. यामध्ये भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्यावर बांगलादेशचा नुरूल हसन याने ‘फेक फिल्डींग’ केल्याचा आरोप लावला. त्यानंतर ही चर्चा चांगलीच रंगल्याने आता त्याला वेगळेच वळन आले आहे. त्यामुळे हसन अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पावासामुळे बांगलादेशला 16 षटकात 151 धावांचे लक्ष्य मिळाले. सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने पराभव मान्य केल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्याचबरोबर एकच चर्चा रंगली, ती भारताच्या विजयाची नाहीतर विराट कोहली (Virat Kohli) याने फेक फिल्डींग केल्याची. त्याच्यावर हा आरोप विकेटकीपर नुरूल हसन (Nurul Hasan) याने लावला. हाच तो खेळाडू आहे, ज्याने अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्या शेवटच्या षटकात चौकार-षटकार ठोकला होता. त्याने आरोप केल्याने त्याला आयसीसीकडून दंड होण्याची शक्यता आहे.
नुरूलने त्याच्या विधानात बांगलादेशच्या डावातील सातव्या षटकाचा उल्लेख केला आहे. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अक्षर पटेल याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लिटन दास याने मिड विकेटवर शॉट खेळला, जो चेंडू सीमारेषेवर जाणार होताच तेव्हा अर्शदीप सिंग याने त्याला अडवले आणि थ्रो केला. तो थ्रो पकडल्याचा विराटने ऍक्शन केली, याचक्षणी बांगलादेशला पाच धावा मिळाल्या पाहिजे होत्या, अशी मागणी नुरूलने केली होती.
विराटने थ्रो केला तेव्हा त्याने नजमुल शांतो याच्याकडे पाहिले देखील नाही. तसेच पंचांच्या निर्णयावर आणि सामना अधिकाऱ्यांवर नाराजी दर्शवल्याने नुरूलला आयसीसीकडून शिक्षा होण्याची शक्यता आहे.
Law 41.5.1 states: “It is unfair for any fielder wilfully to attempt, by word or action, to distract, deceive or obstruct either batsman after the striker has received the ball,”
5 runs should have been awarded to Bangladesh here pic.twitter.com/t1a6Q0femn
— Kaushik Jegadeesan (@kaushik0803) November 2, 2022
फेक फील्डिंग म्हणजे काय
क्रिकेटचा नियम 41.5 च्या नुसार, सामन्यादरम्यान फलंदाजाला मुद्दाम किंवा धोक्याने थांबवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा पंच त्या चेंडूला डेड बॉल घोषित करतात. याचा अर्थ तो चेंडू अवैध असून फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा दिल्या जातात. भारताविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशला 5 धावा मिळाल्या असत्या तर संघ जिंकला असता. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या पंचांंना तसे काही दिसले नाही, म्हणून त्यांनी तो निर्णय दिला नाही आणि सामना पुढे सुरू राहिला
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतापाठोपाठ धवनच्या खांद्यावर आयपीएलच्या ‘या’ संघाची जबाबदारी, तुम्हीही म्हणाल, ‘गब्बर छा गये तुम’
कोहली ऍंड ऍडलेड कनेक्शन! विराटबाबत धोनीचा जुना व्हिडिओ का होतोयं व्हायरल?