राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात पहिला कसोटी सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्य़ात 18 वर्षीय प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉने शतक झळकावले आहे.
त्याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तसेच कसोटी पदार्पणात शतक करणारा तो जगातील 106वा तर भारताचा 15 वा क्रिकेटपटू ठरला आहे.
शतक झाल्यावर शाॅने जोरदार सेलिब्रेशन केले. याबद्दल समालोचक संजय मांजरेकर यांनी पृथ्वी शाॅला विचारले, “तू नक्की त्यावेळी कसला विचार करत होता? तुझ्या डोक्यात कोणती व्यक्ती आली होती?”
यावर बोलताना शाॅने हे शतक आपल्या वडीलांना डेडिकेट करत असल्याचे सांगितले. “मी माझ्या वडिलांचा तेव्हा विचार करत होतो. त्यांनी अनेक गोष्टींचा केवळ माझ्यासाठी त्याग केला. मी जेव्हाही धावा करतो तेव्हा त्यांच्यासाठी करतो. भारताकडून खेळण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. मला ही संधी मिळाली होती आणि मला ती व्यर्थ घालवायची नव्हती. याचमुळे मी ही चांगली कामगिरी करु शकलो असेल. “असे शाॅ यावेळी बोलताना म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-