दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवत जोरदार पुनरागमन केले होते. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (Sa vs Ind 3rd test) केपटाऊनमध्ये (Cape town) पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान, हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय कर्णधाराने आर अश्विनचे (R Ashwin) तोंडभरून कौतुक केले आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, “जडेजाचे महत्त्व आणि त्याने संघासाठी काय केलं आहे, हे सर्वांना माहीत आहे. परंतु, मला असे वाटते की, अश्विन ही भूमिका योग्यरित्या पार पाडत आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “ॲशला (आर अश्विन) माहीत आहे की, त्याच्या खेळात खूप सुधारणा झाली आहे. मुख्यतः परदेशात गोलंदाजी करण्यात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याला स्वतःला हे समजले असेल.”
हे नक्की पाहा :
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विनने ५० चेंडूंमध्ये ४६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तर केएल राहुलने ५० धावांचे योगदान दिले होते. ज्यामुळे भारतीय संघाला २०० धावांचा पल्ला गाठण्यात यश आले होते.
याच कामगिरीबाबत बोलताना तो पुढे म्हणाला की, “गेल्या कसोटी सामन्यातील त्याचे फलंदाजीचे योगदान आणि दुसऱ्या डावात त्याने ज्याप्रकारे गोलंदाजी केली ती पाहिली, तर मला वाटते की ते संघासाठी मोठे योगदान होते. तो अतिशय सहज स्थितीत आहे ज्यामध्ये तो संघासाठी योगदान देण्यास तयार आहे आणि तो योग्य मार्गाने आणि योग्य दिशेने करत आहे.” मालिकेतील अंतिम कसोटी सामना ११ जानेवारी पासून केपटाऊनच्या मैदानावर पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
श्रेयस भूषवणार आयपीएल विजेत्या संघाचे कर्णधारपद? कोट्यवधींची बोली लावण्यासाठी फ्रॅंचाईजी तयार