---Advertisement---

राहुल की रिषभ पंत, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असेल विकेटकीपर? रोहित म्हणाला, ‘दोघांमध्येही सामना….

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आज (06 फेब्रुवारी) गुरुवारपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडिया या तीन सामन्यांमध्ये  सर्वोत्तम प्लेइंग 11 मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करेल. पण संघात कोणता खेळाडू यष्टीरक्षक म्हणून खेळेल अद्याप याबद्दल गोंधळ आहे. ही जागा घेण्यासाठी रिषभ पंत आणि केएल राहुल यांच्यात स्पर्धा आहे. या दोन्ही खेळाडूंपैकी कोणाला संधी दिली जाणार यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठे विधान केले आहे.

इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी रोहितने प्लेइंग 11 बाबत काही मोठे संकेत दिले आहेत. रोहितने सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत सांगितले की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघाचा यष्टीरक्षक म्हणून केएल राहुल आणि रिषभ पंत यांच्यापैकी एकाची निवड करणे डोकेदुखी ठरेल, परंतु पंत त्याची भूमिका कायम ठेवण्याची शक्यता असल्याचे त्याने संकेत दिले. 2023 च्या विश्वचषकात पंतच्या अनुपस्थितीत राहुलने यष्टीरक्षक म्हणून शानदार कामगिरी केली.

रोहित म्हणाला, ‘राहुल गेल्या अनेक वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करत आहे. त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. जर तुम्ही गेल्या 10-15  एकदिवसीय सामन्यांवर नजर टाकली तर संघाला त्याच्याकडून जे अपेक्षित होते ते त्याने केले आहे. पण दुसरीकडे रिषभही आहे. आमच्याकडे त्यांच्यापैकी एका कोणाला तर निवड करावी लागेल. दोघांमध्येही स्वतःच्या बळावर सामना जिंकण्याची क्षमता आहे. राहुल आणि रिषभ यांच्यापैकी कोणाला खेळवायचे हे एक मोठे डोकेदुखी असेल. पण मागील कामगिरी पाहता, आपल्यासाठी सातत्य राखणे देखील खूप महत्वाचे आहे.

पत्रकार परिषदेत, जेव्हा रोहित शर्माला त्याच्या खराब फॉर्मबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार येत असतात. त्याने हे यापूर्वी बरेच काही पाहिले आहे. रोहित म्हणाला, ‘हा कसला प्रश्न आहे?’ हा वेगळा फॉरमॅट आहे. क्रिकेटपटू असल्याने आपल्याला माहित आहे की चढ-उतार येणारच. हे माझ्यासाठी काही नवीन नाही. प्रत्येक दिवस नवीन असतो, प्रत्येक मालिका एक नवीन मालिका असते.

हेही वाचा-

टीम इंडियाचे पुढचे विराट कोहली-रोहित शर्मा कोण असतील? माजी प्रशिक्षकाने या खेळाडूंना निवडले
अविश्वसनीय! सुपर किंग्जच्या खेळाडूने घेतला सुपरमॅन स्टाईलमध्ये अशक्य झेल, VIDEO
नागपूरमध्ये विराट-रोहितची बॅट आग ओकते, दोघांनी मिळून केल्या आहेत ‘इतक्या’ धावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---