भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा असा विश्वास आहे की आयपीएलमुळे खेळामध्ये दोन ‘सकारात्मक बाबी’ येऊ शकतात. गल्फ न्यूजशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, आयपीएल २०२०चे यजमान युएईला ‘क्रिकेट हब’ बनण्याची संधी असणार आहे.
आयपीएलमध्ये या संदर्भात दोन मोठे सकारात्मक मत आहेत. प्रथम खेळाडूंना मैदानावर परत जाण्याची संधी मिळतेय आणि त्यानंतर युएईला एक मोठे क्रिकेट हब बनण्याची संधी मिळत आहे.
शास्त्रीना वाटतंय यूएई क्रिकेटमध्ये एक मोठं नाव बनवण्याची क्षमता ठेवत आहे. ते म्हणाले, मी आयपीएल २०१४ च्या हंगामात सांगितले होते की जर आयपीएल कधी विदेशात खेळवण्याची गरज पडली तर यूएई हा चांगला पर्याय आहे. कारण येथे उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि भारतीय एक्सपेट्सची खूप संख्या आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वच देश आंतरराष्ट्रीय सामने सुरक्षित ठिकाणी घेत आहेत.
शास्त्री असेही म्हणाले की, युएई केवळ आयपीएलच नव्हे तर आयसीसीच्या स्पर्धा आणि दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेसाठीही एक चांगले ठिकाण देखील विकसित होऊ शकते.
जर सर्व काही व्यवस्थित झाले तर युएईमध्ये कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे तसेच द्विपक्षीय मालिकेचे आयोजन करायला हवे.
ते म्हणाले, आम्ही येथे पाच महिने क्रिकेट न खेळल्याबद्दल बोलत आहोत. दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान हा खेळ सहा वर्ष थांबला होता. कोणीही कोरोना येताना पाहिला नाही. सिस्टमलाही हा मोठा धक्का होता. ज्याने बर्याच लोकांचे जीवनमान उध्वस्त केले. याबाबतीत काय करू शकता? असंही शास्त्री म्हणाले.
पुढे ते म्हणाले, गेल्या पाच महिन्यांपासून सर्व भारतीय खेळाडू क्रिकेटपासून दूर आहेत. चांगली गोष्ट म्हणजे ते कसोटी सामन्यांऐवजी टी२० सामन्यांनी सुरुवात करत आहेत. जे अवघ्या तीन तासात संपेल.
भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले शास्त्री म्हणाले, आयपीएल यापेक्षा चांगल्या वेळेत येऊ शकली नसती. कारण यामुळे विराट कोहली आणि भारतीय संघातील खेळाडूंना काही सामन्यांसाठी वेळ मिळेल.
शास्त्री यांच्या या विधानाला भारताच्या बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौर्याच्या संदर्भातून पाहिले गेले पाहिजे कारण कोरोनानंतर भारतीय संघाची पहिली कसोटी मालिका असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-पराक्रम केलाय ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने, आनंद झाला युएईमध्ये असलेल्या विराट कोहलीला
-क्रिकेटच्या खेळपट्टीवर चक्क डान्स करताना दिसला विराट कोहली; पहा व्हिडिओ
-शतक ठोकलेला फलंदाज म्हणतो, मी कितीही धावा केल्या, तरी मला संघात स्थान मिळू शकत नाही
ट्रेंडिंग लेख-
-सीपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे ५ खेळाडू आयपीएलमध्येही धमाका करण्यास सज्ज