---Advertisement---

रियान परागने हर्षल पटेलसोबतच्या वादाची सांगितली ईनसाईड स्टोरी, बघा काय म्हणाला तो?

Riyan-Parag-And-Harshal-Patel
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू रियान परागचे प्रदर्शन काही खास नव्हते. पण तो हंगामातील वादांमुळे सर्वांच्याच लक्षात आहे. त्याने स्वतःच्याच संघातील रविचंद्रन अश्विन आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या हर्षल पटेलसोबत मैदानात वाद घातल्याचे दिसले. यासाठी रियानला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. आता रियानने अश्विन आणि हर्षलसोबत नेमके मैदानात काय घडले होते?, याचा खुलासा केला आहे.

एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना रियान पराग (Riyan Parag) रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांच्याशी झालेल्या वादाविषयी महत्वाची माहिती चाहत्यांना देतो. अश्विनसोबत त्याचा वाद धावबाद झाल्यामुळे झाला होता. विकेट गमावल्यानंतर रियानने अश्विनकडे रागात पाहिले होते आणि हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. रियानने सांगितल्याप्रमाणे सामना संपल्यानंतर अश्विनने धावबादसाठी त्याची माफी मागितली होती.

हर्षलशी झालेल्या वादावर बोलताना रियान म्हणाला की, “तो स्वतः काहीच नाही बोलला, पण मोहम्मद सिराज म्हणाला की, तू अजून लहान आहे आणि लहानासारखाच वाग.”

राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीच्या सामन्यात रियानने हर्षलच्या एका षटकात चांगल्या धावा केल्या. परागने यावेळी गोलंदाजी करणाऱ्या हर्षलला मैदान सोडण्याचा इशारा केला होता आणि यावरूनच हा वाद पेटला. यानंतर सिराजने त्याला बोलावले आणि दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली. नंतर इतर खेळाडू मध्ये पडल्यामुळे वातावरण शांत झाले. सामना संपल्यानंतर हर्षलने रियानसोबत हातमिळवणी देखील केली नाही.

https://twitter.com/HiPrsm/status/1533110397703966720?s=20&t=4KrsKKnLRhNSHgr89eq7NQ

 

आता रियानने सांगितले आहे की, हर्षलने आयपीएल २०२१ मधील एका सामन्यात त्याला बाद केले होते. तेव्हा विकेट गमावल्यानंतर तो पवेलियनच्या दिशेने जात होता आणि हर्षलने त्याला मैदान मोकळे करण्यासाठी खुनावले होते. त्याने असेही सांगितले की, मैदानात असताना त्याने हर्षलकडे पाहिले नव्हते, पण नंतर रिप्लेमध्ये त्याला हे समजले. हर्षलच्या याच कृत्याचा रियानने आयपीएल २०२२ मध्ये एकप्रकारे बदला घेतला.

रियानने हर्षलचा बदला घेतला खरा, पण सिराजला मात्र हे आवडले नाही. त्याचा डाव संपल्यानंतर सिराजने त्याला बोलावले आणि सुनावले देखील. यावर रियान सिराजला म्हणाला की, “भैया, मी काहीच म्हटलो नाहीये.” मग दोन्ही संघातील सहकारी आणि इतर खेळाडू आल्यामुळे हा वाद मिटला. पण रियानचे वागणे हर्षलच्या मनाला लागल्याचे दिसते. कारण सामना संपल्यानंतर त्याने रियानच्या हातात हात देखील दिला नाही. रियानच्या मते हर्षलचे हे वागणे योग्य नव्हते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: आयपीएलमध्ये ‘कल्ला’ करणाऱ्या ‘या’ तीन खेळाडूंवर राहिल नजर

कडकडून मिठी अन् कौतुक! लॉर्ड्सवर शतक करणाऱ्या रुटचे कर्णधार स्टोक्सकडून ‘ग्रँड वेलकम’

रहाणे आणि शर्माचे वय झालंय; ऑस्ट्रेलियच्या दिग्गज खेळाडूचे मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---