श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध नागपूर एकदिवसीय सामन्यात खेळणार नव्हता. आदल्या रात्री चित्रपट पाहत तो विश्रांती घेत होता. पण अचानक त्याला कर्णधार रोहित शर्माचा फोन आला की विराट कोहली दुखापती आहे. त्यामुळे तू उद्या खेळणार आहेस. मग श्रेयस अय्यरने चित्रपट रात्री रद्द केली. मैदानावर खळबळ उडवण्याची तयारी सुरू केली. 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, अय्यरने 36 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 59 धावांची मॅच विनिंग खेळी खेळली. सामन्यानंतर, श्रेयसने रोहित शर्मासोबत रात्री उशिरा झालेल्या फोन कॉलचा खुलासा केला.
श्रेयस अय्यरने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “मी पहिला वनडे सामना खेळणार नव्हतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की, दुर्दैवाने विराट जखमी झाला आणि नंतर मला संधी मिळाली. पण मी स्वतःला तयार ठेवले होते. मला माहित होते की मला कधीही खेळण्याची संधी मिळू शकते. आणि गेल्या वर्षी आशिया कप दरम्यान माझ्यासोबत असेच घडले. मी जखमी झालो आणि दुसरा कोणीतरी येऊन शतक ठोकले.”
तो पुढे म्हणाला, “ही खरोखरच मजेदार गोष्ट आहे. मी काल रात्री एक चित्रपट पाहत होतो. मला वाटले की मी रात्री उशीरा झोपू शकतो. मग मला कर्णधाराचा फोन आला की मी पहिला सामना खेळणार आहे. कारण विराटचा गुडघा सुजला आहे. त्यानंतर मी पटकन माझ्या खोलीत परतलो आणि थेट झोपी गेलो.”
Shreyas Iyer just confirmed that he wouldn’t have been playing in the first ODI if Kohli was fit. ???? pic.twitter.com/kf6NCL0suk
— Johns. (@CricCrazyJohns) February 6, 2025
गेल्या काही वर्षांपासून अय्यर हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने 2019 च्या विश्वचषकादरम्यान संघाला त्रास देणारा प्रश्न सोडवला होता. 2023 च्या विश्वचषकात त्याने 66.25 च्या सरासरीने 530 धावा करून खळबळ उडवून दिली. तो स्पर्धेत भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. नागपूर वनडेमध्ये त्याने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली.
हेही वाचा-
सामन्यानंतर रोहित शर्माचं कडवटं मत, भारताचा विजय महत्त्वाचा, पण…
“हुकलेला पुल, हरवलेली लय”, रोहित शर्माच्या पुनरागमनाची वाट पाहतोय भारत!
नागपूरचा वनडे सामना भारताच्या नावे, इंग्लंडचा दारुण पराभव, गिल-अय्यरची निर्णायक खेळी





