नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका पार पडली. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांचा निकाल अवघ्या तीन दिवसांमध्ये लागला. खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याने दोन्ही संघांच्या फलंदाजांनी त्याचे नुकसान सोसावे लागले. या भारतीय खेळपट्टीवर अनेक विदेशी खेळाडूंनी टीका केली. पण क्रिकेट जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या मते खेळाडूंनी प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहिले पाहिजे.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या मते क्रिकेटची आवड चाहत्यांमध्ये कायम ठेवण्यासाठी सामना किती दिवस चालला हे पाहिले जायला नको. त्याऐवजी सामना किती रोमांचक झाला हे पाहण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे सिचन तेंडुलकरला वाटते. यावर्षीच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने भारताने, तर तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या तिन्ही सामन्यांचा निकाल प्रत्येकी तिसऱ्या दिवशी लागल्याने अनेक दिग्गज नाराज दिसले. भारतीय संघ आणि बीसीसीआयवर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाल्या. पण सचिनच्या मते क्रिकेटपटूचे काम कोणत्याही परिस्थितीत खेळण्यासाठी तयार राहिले पाहिजे.
एका वृत्तमाध्यमाशी चर्चा करताना सचिन म्हणाला, “आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, कसोटी क्रिकेट आकर्षक असले पाहिजे. त्यामुळे सामना किती दिवस चालला, यावर अधिक लक्ष नको आहे. आपण (क्रिकेटपटू) वेगवेगळ्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी तयार झालो आहोत. मग खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असो किंवा फिरकी गोलंदाजांसाठी, आपली कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची तयारी पाहिजे.”
“जेव्हा तुम्ही एखादा दौरा करता, तेव्हा परिस्थिती सोपी नसते. याठिकाणी परिस्थिती समजून घ्यावी लागते. प्रत्येक गोष्टीचे निरिक्षण करा आणि नंतर योजना बनवा. आयसीसी आणि एमसीसीसोबत आपण सर्वच कसोटी क्रिकेटविषयी चर्चा करत आहोत. कसोटी क्रिकेटला सर्वोत्तम फॉरमॅट म्हणून कायम ठेवण्यासाठी आपल्याला गोलंदाजांसाठी काहीतरी योजना बनवण्याची गरज आहे. कारण गोलंदाज प्रत्येक चेंडूवर प्रश्न विचारतात आणि फलंदाजाला त्याचे उत्तर द्यावे लागते,” असेही सचिन पुढे म्हणाला.
(Sachin Tendulkar’s scathing reply to critics of Indian pitching)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईची विजयी मालिका खंडित! युपीने दाखवला WPL मधील पहिला पराभव
वनडे क्रिकेट वाचवण्यासाठी सचिनने सांगितले ‘मास्टर सोल्युशन’! म्हणाला,”असा विचार करा”