---Advertisement---

तेंडुलकर, गांगुली ते अय्यर, गिल, आजी-माजी क्रिकेटर्सकडून ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव

On: मंगळवार, ऑगस्ट 17, 2021 5:36 PM
---Advertisement---

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय संघाने विजय मिळवून भारतीयांना उत्सव साजरा करण्याची संधी दिली.

या सामन्यातील शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर होता. परंतु मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी मिळून भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली.त्यानंतर गोलंदाजी करताना देखील या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना १५१ धावांनी आपल्या नावावर केला. ज्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. अशातच भारतीय दिग्गज खेळाडूंनी या खेळाडूंचे कौतुक केले आहे.

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ट्विट करत लिहिले की,”या सामन्यातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला. भारतीय संघाने या सामन्यात कठीण परिस्थितीचा निडर होऊन सामना केला.”

तसेच वीरेंद्र सेहवागने ट्विट करत लिहिले की, “दिवसाची सुरुवात ,’सामना वाचवू शकतील का’ पासून झाली होती. त्यानंतर लॉर्ड्स कसोटीत विजय, असे खूप कमी संघ आहेत, जे असे पुनरागमन करु शकतात. खरंच खूप चांगले खेळले भारतीय खेळाडू. जसं की म्हटलं जातं भारतीयांना कधीही कमी लेखू नका.”

तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी देखील ट्विट करत भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. त्यांनी लिहिले की, “भारतीय एक विलक्षण विजय. संघातील खेळाडूंची अप्रतिम कामगिरी, इतक्या जवळून हा विजय पाहून खूप आनंद झाला.” गांगुली या सामन्यावेळी लॉर्ड्स ग्राउंडवर उपस्थित होते. (Sachin Tendulkar,vvs laxman, sourav ganguly, Virender Sehwag, yuvraj singh reaction after India win against England)

अन्य आजी-माजी क्रिकेटपटूंनीही भारतीय संघाचे कौतुक केले.

या सामन्याच्या पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट ) भारतीय संघ पराभवाच्या वाटेवर असताना मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी ८९ धावांची भागीदारी करून भारतीय संघाला पुनरागमन करून दिले. भारतीय संघाने २९१ धावांवर डाव घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी २७२ धावांची आवश्यकता होती.

परंतु, भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता. इंग्लड संघाकडून कर्णधार जो रूटने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. तर जोस बटलरने २५ धावांची खेळी केली.इंग्लंड संघाचा संपूर्ण डाव १२० धावांवर संपुष्टात आला.हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

लॉर्ड्सवरील संस्मरणीय विजयानंतर विराटला झाली धोनीची आठवण, म्हणाला…

जो रुटचे ‘ते’ तीन निर्णय, जे इंग्लंड संघाला लॉर्ड्स कसोटीत पडले महागात

लॉर्ड्स मोहिम फत्ते करणाऱ्या सर्व ११ शिलेदारांच्या प्रतिक्रिया, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---