नवा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. अशा परिस्थितीत, आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (IND vs ENG) या कामगिरीची पुनरावृत्ती त्यांना करायची आहे. याआधी संघाने टी२० मालिका २-१ अशी जिंकली होती. मात्र, सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला. माजी कर्णधार विराट कोहलीचे दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळणे साशंक आहे. मात्र, युवा खेळाडूंनी टी२० मालिकेत ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यामुळे संघ व्यवस्थापन खूश आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला टी-20 मालिकेतील खराब फॉर्ममधून सावरण्याची इच्छा आहे.
या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी सलामीला येईल. धवन जरी टी२० संघाचा भाग नसला तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना येथे चांगली कामगिरी करायला आवडेल. रोहित आणि धवन ही जोडी भारताची वनडेतील दुसरी सर्वात यशस्वी सलामीची जोडी आहे. आज जर त्यांनी ६५ धावांची भागीदारी केली तर ते माजी दिग्गज सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या विक्रमाची बरोबरी करतील.
५००० धावा पूर्ण करण्याची संधी
सचिन आणि गांगुली या जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ६६०९ धावांची भागीदारी केली आहे. यादरम्यान त्याने २१ शतके आणि २३ अर्धशतकांच्या भागीदारी केल्या आहेत. रोहित आणि धवनने आतापर्यंत सलामीची जोडी म्हणून ४९९४ धावांची भागीदारी केली आहे. अशा स्थितीत या दोघांनीही आज ५०० धावांची भागीदारी केल्याने ते ५ हजार धावांच्या विक्रमाला स्पर्श करतील. म्हणजेच ते सचिन आणि गांगुलीच्या ५ हजार धावांच्या विक्रमाची बरोबरी करतील. १११ डावांमध्ये या दोघांनी आतापर्यंत १७ शतके आणि १५ अर्धशतकांची भागीदारी केली आहे.
शिखर धवनचा ओव्हल मैदानावरचा विक्रमही उत्कृष्ट आहे. त्याने आतापर्यंत ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १११ च्या सरासरीने ४४३ धावा केल्या आहेत. त्याने ३ शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. १२५ धावांची सर्वोच्च खेळी. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा संघाला त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्याचवेळी रोहित शर्माने ५ सामन्यात ४० च्या सरासरीने १९९ धावा केल्या आहेत. ३ अर्धशतके केली आहेत. रोहितची इंग्लंडमध्ये एकूण कामगिरी चांगली आहे. त्याने येथे २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७ शतके झळकावली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
क्रिकेट दिग्गजांचे म्हणणे बीसीसीआयने ऐकले?, विराट कोहली पहिल्या वनडेतून बाहेर होण्याची शक्यता
‘सचिन-कोहली, सेहवाग-रोहित, धोनी-?’, प्लेअर्सच्या रिप्लेसमेंटवर एका चाहत्याचे ट्वीट होतंय व्हायरल
सनथ जयसूर्याने मानले भारताचा आभार, म्हटला ‘आर्थिक संकटात ते नेहमीच आमच्यासोबत उभे राहिले’






