वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२२ जुलै) खेळला गेला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या ३०८ पर्यंत पोहोचवली होती. यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज व या सामन्यात उपकर्णधारपदाची भूमिका बजावत असलेला श्रेयस अय्यर यानेदेखील मोठे योगदान दिले. त्याने एक वेगवान अर्धशतक साजरे करत काही विक्रमांना गवसणी घातली.
श्रेयसचे वेगवान अर्धशतक
मालिकेतील या पहिल्या सामन्यात उपकर्णधार रवींद्र जडेजा उपलब्ध नसल्याने श्रेयसला ही जबाबदारी देण्यात आली. त्याने आपली ही जबाबदारी एकप्रकारे साजरी केली. शिखर धवन व शुबमन गिल यांनी प्रथम संघाला शतकी सलामी दिली. त्यानंतर श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने ५७ चेंडूवर ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. त्याला युवा गोदकेश मोटीने बाद केले.
या विक्रमांतही झाला सहभागी
श्रेयसने आपल्या अर्धशतकी खेळीत काही विक्रम नोंदवले. भारताकडून आपल्या पहिल्या २५ वनडे डावांमध्ये सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावांच्या खेळ्या करणाऱ्या फलंदाजांत तो दुसऱ्या स्थानी आला. त्याची ही ११ वी ५०+ धावांची खेळी आहे. या यादीमध्ये १२ वेळा ५०+ धावांची खेळी करून माजी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू अव्वल स्थानी आहेत. विराट कोहली व शिखर धवन यांनी अनुक्रमे १० व ९ वेळा अशी कामगिरी करून दाखवलेली.
यासोबतच सर्वात कमी वनडे डावात १००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजातही तो संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने २५ व्या डावात ही कामगिरी करून दाखवली. या आधी सिद्धू यांनीच अशी कामगिरी केलेली. या यादीमध्ये विराट कोहली व शिखर धवन २४ डावांसह संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत. तर, केएल राहुल २७ डावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धवन-गिलची झक्कास कामगिरी! दोघांनीही मागे सोडला ‘विक्रमादित्य सचिन’
भारताच्या यतिंदर सिंगने मालदीव जिंकले! संघाने शेवटच्या दिवशी ठोकला सुवर्ण पदकांचा षटकार
‘शार्दुल ठाकुरकडे हार्दिक पंड्याएवढी क्षमता नाहीये…’, माजी दिग्गजाची प्रतिक्रिया चर्चेत