भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका ऑक्टोबर महिन्यात होईल, ज्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीही (Virat Kohli) खेळणार आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की ही रोहित शर्माची शेवटची वनडे मालिका असेल आणि त्यानंतर ते निवृत्तीची घोषणा करू शकतो.
अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की, रोहित जर निवृत्त झाला, तर त्याच्या जागी भारतीय वनडे संघाचे नेतृत्व कोण करणार? आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांना वाटते की तो खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas iyer) नसून शुबमन गिल (Shubman gill) असेल. आकाश चोप्रा म्हणाले की सध्या अफवांचा बाजार तापला आहे. असे म्हटले जात आहे की श्रेयस अय्यर पुढचा वनडे कर्णधार ठरेल आणि तो शुबमन गिलला मागे टाकेल. पण माझ्या मते पुढचा कर्णधार कोण असेल हे आधीच ठरलेले आहे. आणि तो खेळाडू म्हणजे शुबमन गिल असणार आहे.





