दुबई येथे 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात (Champions Trophy 2025) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 252 धावांचे लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर संघ डगमगला आणि त्यांनी लवकर विकेट गमावल्या.
मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) चांगली फलंदाजी केली पण अर्धशतक झळकावण्यात तो हुकला. त्याने 62 चेंडूत 48 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. मात्र, श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर भारताला आणखी एक धक्का बसला.
श्रेयस अय्यर व्यतिरिक्त, भारताने रोहित शर्मा (76), शुभमन गिल (31) आणि विराट कोहली (1) यांचेही बळी गमावले आहेत. 35 षटकांनंतर भारताचा स्कोअर 4 बाद 183 धावा आहे. भारताला विजयासाठी अजूनही 69 धावांची आवश्यकता आहे. त्यांच्या 6 विकेट शिल्लक आहेत. न्यूझीलंडची गोलंदाजी चांगली झाली आहे. मिचेल सँटनरने 2, तर ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी 1 बळी घेतला आहे. सामना अजूनही रोमांचक टप्प्यात आहे. भारताला जिंकण्यासाठी चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे, तर न्यूझीलंडला भारतावर दबाव कायम ठेवायचा आहे.
हेही वाचा –
विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॅाफी फायनलमध्ये सुपर फ्लॅाप? पहा आकडेवारी काय म्हणतेय?
किंग’ ची ‘क्वीन’ झाली ‘क्लीन-बोल्ड’; विराटच्या अपयशाने अनुष्का निराश
नाद खुळा! क्रिकेटमध्ये असा कॅच तुम्ही पाहिला नसेल!






