बांगलादेश संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघामध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला कसोटी सामना हा ड्रॉ झाला होता. हा सामना कँडी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. आता त्या स्टेडियमधील खेळपट्टीला आयसीसी तर्फे एक डीमेरीट अंक देण्यात आला आहे.
या सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद ५४१ धावांवर डाव घोषित केला होता. तर दुसऱ्या डावात २ गडी बाद १०० धावा केल्या होत्या. श्रीलंकन संघाला या सामन्यात एकदाच फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. श्रीलंकन संघाने ८ बाद ६४८ धावा करत डाव घोषित केला होता. त्यामुळे या खेळपट्टीवर सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
सामनाधिकारी रंजन मदुगले या खेळपट्टीबाबत बोलतांना म्हणाले, “पाच दिवसांच्या खेळानंतर खेळपट्टीत क्वचितच बदल घडला असावा. खेळ जसजसा वाढत गेला तसतसे बॉल आणि बॅट मधील संतुलन बदलू शकले नाही. खेळपट्टी पूर्ण सामन्यात फलंदाजीसाठी अनुकूल होती. या सामन्यात १७ गडी बाद होऊन ७५.८२ च्या सरासरीने तब्बल १२८९ धावा झाल्या होत्या. जे खूप जास्त आहेत. म्हणूनच आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मी ज्या खेळपट्टीवर सामना झाला त्या खेळपट्टीला सरासरीने खराब रेटिंग देत आहे.”
खेळपट्टी व आऊटफील्ड मॉनिटरींगच्या सुधारित नियमांनुसार, सरासरीपेक्षा खाली रेटिंग असलेल्या खेळपट्टीला एक डीमेरिट अंक दिला जातो. तर, खराब आणि आणि अनफिट खेळपट्ट्या असलेल्या जागेला अनुक्रमे तीन आणि पाच डीमेरिट गुण दिले जातात.
तसेच हे डीमेरीट गुण ५ वर्षापर्यंत सक्रिय असतात. या नियमानुसार जर एखाद्या खेळपट्टीला ५ किंवा त्यापेक्षा जास्त डीमेरीट गुण दिले गेले तर त्या स्टेडियमवर १२ महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय सामने आयोजन करण्यावर बंदी घालण्यात येते. जर १० डीमेरीट गुण झाले तर त्या स्टेडियमवर २४ महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय सामने आआयोजित करण्यावर बंदी घालण्यात येते.
महत्वाच्या बातम्या:
माझ्या या चुकीमुळे आम्ही सामना गमावला, वॉर्नरने पराभवानंतर दिली कबुली
आयपीएलवर कोरोनाची सावली गडद! खेळाडूंपाठोपाठ दोन अंपायर्सनी देखील घेतली माघार