आर श्रीधर २०१४ पासून भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणजे रुजू झाले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्री यांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतक सुद्धा केले होते. आर श्रीधर हे एक चांगले क्षेत्ररक्षक असण्याव्यातिरिक्त एक चांगले श्रोते देखील आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांचं म्हणणे ते काळजीपूर्वक ऐकतात आणि त्यावर नित्य विचारविनिमय करूनच योग्य निर्णय देखील घेतात.
ऑस्ट्रेलिया संघाच्या अभूतपूर्व विजयानंतर आर श्रीधर यांनी भारताचा क्रिकेटपटू रिषभ पंत याचे कौतुक केले आहे. रिषभ पंत याने आपले यष्टिरक्षण सुधरवण्यासाठी फलंदाजी सुद्धा सोडून दिली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. पंत याची प्रशंसा करताना ते म्हणाले की, ”जेव्हा जेव्हा तो खेळतो तेव्हा समोरील व्यक्तीला हृदयविकाराचा झटका नक्कीच येईल इतक्या जोशाने तो आपली खेळी खेळत असतो.” त्याने तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत शानदार खेळी खेळून सर्वांच मन वेधून घेतल होते.
रिषभ पंतच्या कठोर परिश्रमाचा परिणाम हा त्याने खेळलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत दिसून आला, त्यामळे त्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा दिसून आली. पंत जर असाच खेळला तर त्याच्यावर कोणीच बोट उचलू शकत नाही असा आर श्रीधर यांचा दावा आहे. त्याच्या कडून आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे हे आपण पाहूच. मात्र वेळप्रसंगी त्याने फलंदाजी सोडून यष्टिरक्षणावर लक्ष देण्याचेही ठरवले होते, ही बाब नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे, असे श्रीधर म्हणाले.
ब्रिस्बेन मधील गाबाच्या मैदानावर झालेल्या मालिकेच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात पंतच्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला तीन गडी राखून पराभूत केले. त्यासोबतच याच दौऱ्यात त्याच्या नावावर दोन अर्धशतकांचा देखील समावेश आहे. श्रीधर यांच्या मते ती खेळी फार अविस्मरणीय होती. डावखुरी फलंदाजी करणारा रिषभ पंत हा एक विस्फोटक खेळाडू आहे तसेच तो तितकाच धैर्यवान देखील आहे, अशी पुस्तीही श्रीधर यांनी यावेळी जोडली.
महत्वाच्या बातम्या: