भारतीय आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये येत्या ऑगस्ट महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. या सुट्टीमध्ये भारतीय खेळाडू मौज मस्ती करताना दिसून आले होते. तसेच रिषभ पंत देखील फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेला होता. पण नुकताच त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. अशातच बीसीसीआय अध्यक्ष त्याचा बचाव करण्यासाठी पुढे आले आहेत.
भारतीय संघाचा पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे.तत्पूर्वी भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे. रिषभ पंतबरोबर आणि सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंत सुट्टीच्या काळात फुलबॉल सामना पाहायला गेला असताना विनामास्क कॅमेरात कैद झाला होता. त्याच्या निष्काळजीपणामुळे तो कोरोनाच्या विळख्यात सापडले असल्याचे सांगत अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.
मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रिषभ पंतचा बचाव केला आहे. न्यूज १८ सोबत बोलताना त्यांनी म्हटले की, “दरवेळी कोणालाही मास्क घालणे शक्य नसते. आम्हीही इंग्लंडमध्ये युरो चषक आणि विंबलडन स्पर्धा पहिली आहे. नियमांमध्ये बदल झाला आहे. भारतीय खेळाडू सुट्टीवर होते आणि नेहमीच त्यांना मास्क लावून फिरणे शारीरिकरित्या अशक्य होते.” (Sourav Ganguly depends Rishabh pant and says physically impossible to wear mask all time)
भारतीय संघातील इतर सदस्य डरहॅमला पोहोचले आहेत. परंतु रिषभ पंतला जाण्याची अनुमती देण्यात आली नाही. तो जोपर्यंत कोरोनातून पूर्णपणे बाहेर येत नाही, तोपर्यंत त्याला भारतीय संघाच्या बायोबाबलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय संघ २० जुलै पासून सिलेक्ट काउंटी इलेव्हन संघासोबत सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्यात रिषभ पंतऐवजी केएल राहुल यष्टिरक्षण करताना दिसून येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
विराट ब्रिगेडवर कोरोनाचं संकट, तरीही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय
चर्चा तर होणारच! भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने चाहत्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया