श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी प्रभारी कर्णधार शिखर धवनवर विश्वास दाखवला असून श्रीलंका दौऱ्यावर आलेला भारतीय संघ म्हणजे आयपीएलच्या तार्यांमधून निवड करुन बनलेला एक संघ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मिकी आर्थर यांनी स्टार स्पोर्ट्स सोबत बोलताना सांगितले की, “आम्ही सध्या संघात खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्याच्या टप्प्यावर आहोत. आम्ही संघात बर्याच युवा क्रिकेटपटूंना संधी देत आहोत.”
आर्थर पुढे म्हणाले की, “आम्ही कोणत्याही प्रकारच्या गोंधळााच्या स्थितीमध्ये नाही. कारण आम्हाला माहिती आहे की हा एक अद्भुत भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ खूप मजेशीर आहे. त्याच्या संघात बरेच चांगले खेळाडू देखील आहेत. आयपीएलच्या सर्व स्टार खेळाडू मिळून बनवलेला हा 11 जणांचा संघ असेल.”
त्याचबरोबर ऑर्थर पुढे म्हणाले की, “भारतीय संघ हा अविश्वसनीय संघ आहे. त्याच बरोबर आम्हाला आमच्या युवा खेळाडूंना पुढे येण्याची संधी द्यायची आहे. आम्ही बघावे लागेल की कोणते संभाव्य 11 खेळाडू मैदानावर उतरू शकतात.”
त्याचबरोबर मिकी ऑर्थर यांनी इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंका संघाचा झालेल्या पराभवावर देखील आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “हे खरोखर आमच्यासाठी आव्हानात्मक होते. 2023 विश्वचषक पाहता युवा खेळाडूंना संधी देण्याचे आपण ठरवले होते पण आम्हाला ज्येष्ठ क्रिकेटपटूंचीही गरज आहे. यानंतर आमच्या पहिल्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे खेळाडू एकाच वेळी बाहेर पडले. त्यामुळे गोष्टी खूप कठीण झाल्या होत्या. माझ्या 12 वर्षांच्या कारकीर्दीतील हा सर्वात कठीण दौरा होता.”
आता श्रीलंका संघाला भारतीय संघासोबत 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका तर 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना 18 जुलै रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“हार्दिकला भारताचा कर्णधार न केल्याचे वाईट वाटले, तो चांगला पर्याय ठरला असता”