विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहात आहेत. १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वात जास्त धावा कोण करणार? तसेच सर्वाधिक बळी कोण टिपणार? यासंदर्भात जगभरातले क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकार वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. अशात माजी महान भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांनी दोन भारतीय गोलंदाजांची नावे सांगितली आहेत, ज्यांना भारताने जरूर खेळवावे.
माजी भारतीय सलामीवीरआणि कसोटीची क्रिकेटचे महान फलंदाज सुनील गावसकर सांगतात की, “साउथॅम्पटनमध्ये सध्या गरमीचे वातावरण आहे. अशा वेळेस खेळपट्टी सुकत जाते, त्यामुळे फिरकी गोलंदाजांना जास्त फायदा होतो. म्हणून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन्ही अनुभवी फिरकीपटूंना खेळवावे.”
गावसकर सांगतात, “जडेजा आणि अश्विनला या दोघांनाही संधी दिल्याने भारतीय संघाची फलंदाजी खालच्या फळीत अजून मजबूत होते. आश्विन आणि जडेजा दोघांकडे कसोटीमध्ये गोलंदाजीसोबत फलंदाजीचा ही अनुभव आहे.” अश्विनने आजवर कसोटी सामन्यांत ५ शतक केले आहे तर, जडेजाने १ शतक केले आहे. (Sunil Gavaskar expected to play both Jadeja and Ashwin in the scorching heat of southampton)
गावसकर सांगतात, “न्यूझीलंड संघाने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका जिंकून आपला आत्मविश्वास वाढवला असला तरी, भारतीय संघाची तयारी सुद्धा चांगली झाली आहे. आज काल कुठलाही संघ परदेशी दौऱ्यावर जातो, तेव्हा तिकडे तो १ किंवा सराव सामने खेळतो. भारतीय संघाने आपआपसात सराव सामना खेळला आणि भारतीय संघाकडे युवा आणि वरिष्ठ खेळाडूंचा भरणा आहे. काही खेळाडू यापूर्वी इंग्लंडच्या खेळपट्टीवर खेळले आहेत.”
अश्विन आणि जडेजा यांच्या जोडगोळीने गेली कित्येक कसोटी सामने गाजवले आहेत. हे दोघेही फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भरीव कामगिरी करतात.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाच्या मदतीला आला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिले महत्वाचे सल्ले
घे बाबा रुमाल आणि खेळ! हसन अली आणि बाबार आझमचा मजेशीर व्हिडिओ होतोय व्हायरल