इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा उर्वरित भाग १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएल १४ मधील सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अतिशय खराब झाली आहे आणि त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. सनरायझर्स हैदराबादचा लेगस्पिनर रशीद खान याने म्हटले आहे की, त्यांचा संघ आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्येक सामना प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून खेळेल.
हैदराबादने आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात सात पैकी फक्त एक सामना जिंकला होता. आयपीएल १४ च्या पहिल्या टप्प्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादमध्येही मोठी नाराजी होती. हंगामाच्या अर्ध्यातच डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि केन विलियम्सनला संघाची कमान देण्यात आली.
रशीद पुढे म्हणाला की, ‘तो प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. आम्ही उर्वरित सामन्यांसाठी तयार आहोत. आयपीएल १४ चा पहिला भाग आमच्यासाठी चांगला गेलेला नाही. पण आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत आणि प्रत्येक सामना अंतिम सामना म्हणून खेळू आणि आमचे शंभर टक्के योगदान देऊ.’
राशिद खानने संघात पुन्हा सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. रशीद म्हणाला, ‘गेल्या दीड वर्षांपासून, मी माझ्या फलंदाजीवर अधिक काम करत आहे. कारण संघासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना ते खूप महत्वाचे आहेत. फक्त वेगळ्या गोष्टी करण्याचा माझा सर्वोत्तम प्रयत्न आहे. मी बऱ्याच काळापासून नेटमध्ये वेगवेगळ्या फटक्यांचा सराव केलेला नाही. मला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे आणि मनगटाचा योग्य वापर कसा करायचा हे शिकायचे आहे.’
सनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा २२ सप्टेंबर रोजी दुबईत सुरू करेल, सध्या आघाडीवर असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांचा सामना रंगेल.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंड संघ २८ वर्षांनंतर लखनऊला खेळणार कसोटी सामना, कारण आहे खास
टी२० विश्वचषकासाठी १५ जणांच्या मुख्य संघात स्थान न मिळाल्याने शार्दुल ठाकूर नाराज; म्हणाला…
धोनीला भारतीय संघाचा मेंटर बनविल्यानंतर आली वीरूची प्रतिक्रिया, म्हणाला…