वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) स्काय स्टेडियम येथे चौथा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात निर्धारित 20-20 षटकानंतर बरोबरी झाली आहे. त्यामुळे या टी20 मालिकेत सलग दुसऱ्यांदा सुपर ओव्हरचा थरार रंगणार आहे.
आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 7 बाद 165 धावा केल्या. त्यामुळे या सामन्यात बरोबरी झाली आहे.
या टी20 मालिकेत तिसऱ्या सामन्यातही बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर झाली होती. या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला होता.