गाैतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा हेड कोच म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, सूर्यकुमार यादवला भारतीय टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्यानंतर आता सूर्या आयपीएलमध्येही कर्णधार बनू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. वास्तविक, सध्या सूर्या मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएल खेळतो. तर सध्या हार्दिककडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आहे. पण भारतीय क्रिकेट बोर्डाने सूर्याला टी20 संघाचा कर्णधार बनवून मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर आयपीएल फ्रँचायझींमध्ये खळबळ उडाली आहे. यावेळेस आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. ज्या अंतर्गत सूर्या मुंबई इंडियन्स सोडून लिलावात जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे, जर असे झाले तर इतर आयपीएल फ्रँचायझी सूर्याला त्यांच्या संघात सामावून घेण्याचा जोरदार प्रयत्न करतील.
2021 मध्ये सूर्याला 8 कोटी रुपये देऊन मुंबईने रिटेन केले होते. पण 2023 च्या आयपीएलमध्ये मुंबईने रोहितला हटवून हार्दिकला नवा कर्णधार बनवले, ज्यानंतर सूर्यकुमार यादवसह काही खेळाडू या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत सूर्या 2025 च्या लिलावाच्या वेळी मोठा निर्णय घेऊ शकतो.
सूर्या जर मेगा लिलावात उतरला तर या संघांचा कर्णधार होऊ शकतो अशी शक्यता मुळीच नाकारता येत नाही.
लखनऊ सुपरजायंट्स
लखनऊ संघ नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. जर सूर्या लिलावात आला तर लखनऊ सुपरजायंट्स संघ सूर्यकुमार यादवला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी खूप पैसा खर्च करू शकतो. सूर्याला विकत घेऊन लखनऊ त्याला संघाचा कर्णधार बनवू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघही नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. सध्याचा कर्णधार फाफ 40 वर्षांचा झाला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघही भविष्याचा विचार करत आहे. जर सूर्या लिलावात आला तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू फ्रँचायझी त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकते.
केकेआर
सध्या केकेआरचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2024 चे आयपीएल विजेतेपद पटकावले. वास्तविक, गंभीर टीम इंडियाचा कोच आहे आणि सूर्या टी20 टीमचा कर्णधार आहे. आता गंभीरची इच्छा असेल तर तो सूर्याला केकेआरकडे पाठवू शकतो. वास्तविक, सूर्या केकेआरकडून खेळला आहे आणि संघाचा उपकर्णधारही झाला आहे. आता आयपीएलचा मेगा लिलाव जसजसा जवळ येत आहे तसतसे सूर्यकुमार यादवबाबत काय समीकरणे तयार होतील हे पाहणे योग्य राहील.
आता सूर्या हा भारतीय टी20 संघाचा कर्णधार असल्याने पुढील हंगामात मुंबई इंडियन्स फ्रँचायझी कर्णधार बदलून हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्याची शक्यता आहे. रोहितलाही सूर्या आवडतो, त्यामुळे आता मुंबई फ्रँचायजीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी मुंबई सूर्याला कायम ठेवते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे आणि जर तो त्याला संघात ठेवण्यासाठी किती कोटी रुपये मोजतो. येणारा काळ सूर्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या या स्टार गोलंदाजाचं भविष्य संपलं? एकेकाळी दुसरा बुमराह म्हणून होती ओळख
IND vs SL: अशी असणार पहिल्या टी20 साठी टीम इंडियाची प्लेइंग-11? सूर्या-गंभीरच्या जोडीवर राहणार नजरा
टीम इंडियाचे 5 ‘अमीरजादे’, फक्त लक्झरी कार आणि बाईकच नाही तर प्रायव्हेट जेटचे देखील आहेत मालक