यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली गेली. पण पाकिस्तानचा संघ अवघ्या 5 दिवसातच या स्पर्धेतून बाहेर पडला. यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड संघात खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवत चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले. (India Won ICC Champions Trophy 2025)
तत्पूर्वी पाकिस्तानने 2017ला भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये 180 धावांनी पराभूत केले होते आणि चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली होती. त्यावळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या एक्स अकाउंटवर पाकिस्तान क्रिकेट संघ चॅम्पियन्स असल्याचा फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहले होते की, “आपण घरच्या मैदानावर या ट्राॅफीचे रक्षण करू!”
We will defend this at home!#WeHaveWeWill pic.twitter.com/QRrzOdq8ZI
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 16, 2021
पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 4 वर्षापूर्वी केलेली ही भविष्यवाणी सपशेल तोंडावर पडली आहे. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले.
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड संघात दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने 25 वर्षापूर्वीच्या पराभवाचा बदला घेत न्यूझीलंडवर 4 गडी राखून शानदार विजय मिळवला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार कर्णधार रोहित शर्माला देण्यात आला. अशा प्रकारे भारतीय संघाने तब्बल 12 वर्षानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भविष्यवाणी हाणून पाडली.
महत्त्वाच्या बातम्या-
संस्कार! मॅच संपल्यावर कोहली पडला ‘या’ क्रिकेटरच्या आईच्या पाया!
बक्षिसांचा ‘महापूर’; चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारताने केली ‘मालामाल’, इतर संघांनाही मिळाली मोठी रक्कम!
हिटमॅनच ठरला खरा किंग..! अंतिम सामन्यात मिळवला ‘सामनावीर’चा पुरस्कार..!