सध्या भारतीय पुरूष संघातील गोलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय बनत चालली आहे. टी20 विश्वचषक अवघ्या काही दिवसांतच सुरू होणार असून भारतीय संघव्यवस्थापकांपुढचे अडचणी काही कमी होताना दिसत नाही. मुख्य वेगवान जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर झाल्याने तर आणखीनच डोकेदुखी वाढली आहे. त्यातच भारताच्या माजी दिग्गज गोलंदाजाने भुवनेश्वर कुमार याच्यापेक्षा दीपक चाहर याची गोलंदाजी चांगली, असे वक्तव्य केले आहे.
भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने दीपक चाहर (Deepak Chahar) याला भुवनेश्वर कुमारपेक्षा अप्रतिम म्हटले आहे. त्याने म्हटले आजच्या घडीला दीपक चाहर हाच दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करू शकतो.
भुवनेश्वर कुमार याची कामगिरी पाहिली तर तो 2021मध्ये भारताकडून 23 टी20 सामने खेळताना महाग ठरला आहे. त्याने केवळ 15 विकेट्स घेतल्या आणि टेंशन घेण्याची गोष्ट म्हणजे त्याने 159 चेंडू डेथ ओव्हर्समध्ये टाकले आणि 10.03च्या इकॉनॉमी रेटने 266 धावा दिल्या. यावेळी त्याच्याविरुद्ध 20 चौकार आणि 12 षटकार खेचले आहेत.
भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांची तुलना करताना हरभजन म्हणाला,” जसप्रीत बुमराह हा एक असा खेळाडू आहे ज्याला खेळपट्टी कोणतीही असली तरी काहीच फरक पडत नाही, कारण तो जबरदस्त गोलंदाजी करतो. यॉर्कर टाकण्यासाठी तुमच्याकडे एका खास कौशल्याची आवश्कता असते ती बुमराहकडे आहे. तसेच दीपक चाहर हा एकमेव गोलंदाज आहे तो दोन्ही बाजूने स्विंग करू शकतो आणि पॉवरप्लेमध्ये विकेट्सही घेतो. त्याची इनस्विंगही आऊटस्विंगसारखीच खतरनाक असते.”
“आता पाहिले तर चाहर हा भुवनेश्वरपेक्षा अधिक चांगला गोलंदाज आहे. भुवनेश्वरकडे अनुभव आहे, मात्र 19व्या षटकात आपण 8 ते 10 धावा दिल्या तर अधिक नुकसान होत नाही मात्र 15पेक्षा अधिक धावा दिल्या तर ही काळजी करण्यासारखी बाब आहे. तेथेच संघ सामना हरतो,” असेही हरभजनने पुढे म्हटले आहे.
टी20 विश्वचषकासाठी भुवनेश्वरचा मुख्य संघात समावेश केला आहे, तर दीपक चाहर याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले आहे. ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पुरूक असताना भारताचा मुख्य खेळाडूच बाहेर झाल्याने भुवनेश्वर, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांच्यावर जबाबदारी असणार आहे. तसेच मोहम्मद शमी हा पण राखीव खेळाडूंमध्ये आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ठरलं तर! गांगुलीचा पत्ता होणार कट, कोण बनणार बीसीसीआयचा ‘दादा?’
‘बुमराह आणि जडेजाच्या अनुपस्थितीत भारत बनणार चॅम्पियन’, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मोठे विधान