चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएल २०२१ चा अंतिम सामना होणार आहे. या अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ आपल्या चौथ्या जेतेपदासाठी इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाताचा सामना करेल, तर कोलकाताची नजर तिसऱ्या आयपीएल जेतेपदावर असेल. सीएसकेने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये जेतेपदावर आपले नाव कोरले होते. आयपीएलच्या १२ हंगामांमध्ये सीएसकेची ही अंतिम फेरीत जाण्याची नववी वेळ आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला आपले चौथे जेतेपद जिंकायचे असेल तर त्यांना कोलकाताच्या या पाच शूरवीरांना रोखावे लागेल.
शुभमन गिल
केकेआरने दुसऱ्या टप्प्यातील सात पैकी पाच सामने जिंकून प्लेऑफ गाठले आहे. संपूर्ण संघ चांगल्या लयीत आहेत. विशेषत: युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल प्रचंड लयीत आहे. या हंगामाच्या १६ सामन्यांमध्ये गिलच्या बॅटमधून ४२७ धावा आल्या आहेत. त्याची ही कामगिरी कदाचित प्रभावी वाटणार नाही, पण शुभमनने व्यंकटेश अय्यरसह संघाला प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात करून दिली आहे. केकेआरच्या विजयाची पाळंमुळं खरतर तिथेच आहेत.
राहुल त्रिपाठी
राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर येऊन जे अद्भुत काम करतोय ते कोणापासूनही लपलेले नाही. त्याच्या निर्भीड फलंदाजीसाठी ओळखला जाणारा राहुल केकेआरसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. १६ सामन्यात १४१.०३ च्या स्ट्राईक रेटने ३९५ धावा करणारा राहुल नसता तर कदाचित केकेआर अंतिम फेरीत पोहोचला नसता, म्हणणे वावगे ठरणार नाही. दिल्ली विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात अश्विनला षटकार ठोकणाऱ्या या फलंदाजाने चालू हंगामात नाबाद ७४ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळीही केली आहे.
वरुण चक्रवर्ती
आर्किटेक्ट ते क्रिकेटपटू असा प्रवास असलेला वरुण चक्रवर्ती हा कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार आहेत. मधल्या षटकांत येताना, त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या फिरकीने चांगले चांगले फलंदाज बाद केले आहेत. या मोसमात १६ सामन्यांत १८ गडी करणाऱ्या मिस्ट्री स्पिनरने केवळ ६.४० च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. त्याची कामगिरी नेहमी चेन्नई विरुद्ध त्याचे चांगले प्रदर्शन राहिले आहे.
सुनील नरेन
कोलकाताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन. गेल्या काही हंगामात त्याच्या गोलंदाजीची धार जरा बोथट होत होती, पण यंदाच्या हंगामात तो पुन्हा एकदा विरोधकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. सुनील नरेनने १३ सामन्यांत १४ बळी घेत या हंगामात आपला ठसा उमटवला आहे. तो गोलंदाजी सोबतच फलंदाजीही खूप उत्कृष्ट करत असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला मिळणार राशिद खानसारखा अव्वल फिरकीपटू? सचिनने शोधलाय नवा हिरा!
खडतर प्रवासानंतर कोलकात्याची फायनलमध्ये धडक, पण चेन्नईची ‘ही’ आकडेवारी घाम फोडणारी
अंतिम सामन्यात सीएसकेसाठी ‘हा’ धुरंधर ठरेल कर्दनकाळ! कर्णधार धोनीला भक्कम रणनितीची गरज