भारतीय संघासाठी यावर्षीचा टी२० विश्वचषक खूपच निराशाजनक ठरला आहे. भारतीय संघ यावर्षी पहिल्या चार संघांमध्ये देखील स्थान मिळवू शकला नाही. ग्रुप दोनमध्ये भारतीय संघसमोर जास्त कठीण सामने नव्हते, तरीही संघाने त्याच्या पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करला आणि यावर्षीच्या विश्वचषकातून संघ बाहेर पडला. असे असले, तरी पुढच्या वर्षी २०२२ मध्ये पुन्हा टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकात चांगले प्रदर्शन करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. अशात संघाकडून यावर्षी झालेल्या चुका पुढच्या वर्षी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पुढच्या वर्षीच्या टी२० विश्वचषकासाठी काही खेळाडूंना संघातून बाहेर केले जाऊ शकते, ज्यांनी यावर्षी निराशाजनक प्रदर्शन केले आहे.
आपण या लेखात अशाच तीन खेळाडूंची माहिती घेणार आहोत, ज्यांनी पुढच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकापूर्वी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
१. हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या भारतीय क्रिकेटच्या सर्वश्रेष्ठ अष्टपैलूंपैकी एक आहे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हार्दिकने यापूर्वी भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याने अनेक सामन्यात फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. असे असले तरी, त्याच्या पाठीची शस्त्रक्रिया जेव्हापासून झाली आहे, तेव्हापासून तो खराब फॉममध्ये दिसला आहे.
शस्त्रक्रियेनंतर तो नियमित गोलंदाजी करू शकला नाही. त्याने टी-२० विश्वचषकातही अपेक्षित गोलंदाजी केली नाही. जर त्याचे प्रदर्शन असेच राहिले, तर पुढच्या वर्षी टी-२० विश्वचषकात त्याच्या जागी शार्दुल ठाकुर किंवा हर्षल पटेलसारखे खेळाडू संघात स्थान मिळवू शकतात.
२. वरुण चक्रवर्ती
यावर्षी टी२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी वरुण चक्रवर्ती खूप चर्चेत होता. त्याला भारतीय संघाचा नवीन मिस्ट्री स्पिनर मानले जात होत. मात्र, त्याने टी-२० विश्वचषकात ज्याप्रकारचे प्रदर्शन केले, त्यामुळे सर्वाचीच निराशा झाली आहे. त्याला विश्वचषकातील तीन सामन्यात संधी दिली गेली, पण यामध्ये त्याने एकही विकेट घेतला नाही.
चक्रवर्तीने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकून ६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अवघ्या दोन विकेट्स घेतल्या आहेत. त्याला जर पुढच्या वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकात खेळायचे असेल, तर त्याच्या प्रदर्शनात सुधार करावा लागेल. तसे झाले नाही, तर त्याची जागा घेण्यासाठी रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन तयार असतील.
३. भुनेश्वर कुमार
भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार मागच्या काही काळापासून त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला नाही. त्याला यावर्षीच्या टी-२० विश्वचषकात संधी दिली गेली होती, पण त्याने निराशा केली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात तीन षटकात २५ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतला नाही. त्यानंतर त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले गेले. असे असले तरी, तो भारताचा एक महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याचे टी२० मधील आतापर्यंतचे आकडे पाहिले तर ते दखील चांगले आहे.
भुवनेश्वरला मागच्या काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती, त्यानंतर तो सतत खराब फॉर्ममध्ये दिसला आहे. जाणकारांच्या मते त्याच्या चेंडूचा वेग कमी झाला आहे. अशात जर तो पुढच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकापूर्वी स्वत:मध्ये सुधारणा करू शकला नाही, तर त्याला संघातून बाहेर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवेश खान, अर्शदीप सिंग आणि टी-नटराजन यांच्यासारखे नवीन गोलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, जे पुढच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकासाठी भुवनेश्वरची जागा घेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सपशेल फ्लॉप, मेंटर धोनीची स्वारी परतली मायदेशी, फोटो व्हायरल
अरे बापरे! गांगुली स्वस्तात तंबूत परतल्याने वेंकटेश अय्यरला आला होता ताप, नेमकं काय घडलं होतं?
‘रोहित, राहुल असताना तीन टी२० सामन्यांसाठी संघात पाच सलामीवीर कशासाठी?’, माजी क्रिकेटरचा प्रश्न