---Advertisement---

दोन वेळेस विश्वचषक उंचावला, पण मानाच्या रणजी ट्रॉफीत विजयापासून वंचित राहिलेले २ भारतीय शिलेदार

MS Dhoni and Yuvraj Singh
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे आणि टी२० विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व करावे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. परंतु काही मोजकेच खेळाडू असतात, ज्यांचे हे स्वप्न पूर्ण होते. परंतु काही खेळाडू असेही आहेत ज्यांनी एक नव्हे तर तब्बल दोन वेळेस आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी आयसीसी स्पर्धेत विजय मिळवला. परंतु देशातील मानाची स्पर्धा रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले. कोण आहे ते दिग्गज खेळाडू? चला पाहूया. (World Cup winners  who never won Ranji trophy in their entire career)

१) एमएस धोनी (Ms Dhoni)  : भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. तो जगातील एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने आयसीसीच्या तिन्ही स्वरुपातील स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. परंतु या दिग्गज खेळाडूला आपल्या संपूर्ण कारकिर्दीत रणजी ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवून देता आला नाही. त्याने २००० साली बिहार संघासाठी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ज्यावेळी बिहार आणि झारखंडची विभागणी करण्यात आली. त्यावेळी एमएस धोनीने झारखंड संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्य बाब म्हणजे केवळ एमएस धोनीच नव्हे तर, झारखंड आणि बिहार संघाला देखील अजूनही जेतेपद मिळवता आले नाहीये.

२) युवराज सिंग (Yuvraj Singh) : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. त्याने २००७ टी२० विश्वचषक स्पर्धेत आणि २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेत मोलाची भूमिका बजावली होती. या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता. तो १९९७ पासून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत होता. परंतु यादरम्यान त्याला एकदाही पंजाब संघाला रणजी ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद मिळवून देता आले नाही.

रणजी ट्रॉफी स्पर्धेचा इतिहास
रणजी ट्रॉफी स्पर्धा ही भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. १९३४ मध्ये स्पर्धेचे पहिले हंगाम खेळवले गेले होते. या स्पर्धेत सध्या ३८ संघ खेळतात. तर मुंबई संघाने सर्वाधिक ४ वेळेस या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे.

महत्वाच्या बातम्या :

विराटच्या पुनरागमनामुळे कोणाला बाकावर बसवणार? अंतिम कसोटीसाठी अशी असेल ‘भारताची प्लेइंग इलेव्हन’

अंतिम लढतीपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे भारताला ओपन चॅलेंज; सांगितले, तिसऱ्या कसोटीत का हरवणार?

हे नक्की पाहा :

जोहान्सबर्ग कसोटी तर गमवलीच, पण भारतीय खेळाडूंनी वाद घालत सामन्याला लावल गालबोट | INDvsSA Clashes

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---