वनडे विश्वचषक 2023 मधील अखेरचा साखळी सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान खेळला जात आहे. चिन्नास्वामी स्टेडियम येथे होत असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना इतिहास रचला. भारताच्या आघाडीच्या पाचही फलंदाजांनी अर्धशतके ठोकत विश्वचषक इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. गिलने केवळ 32 चेंडूंमध्ये तीन चौकार व चार षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर कर्णधार रोहितने 54 चेंडूंमध्ये 61 धावा करताना आठ चौकार व दोन षटकार खेचले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराटने 56 चेंडूंमध्ये 51 धावांची शानदार खेळी केली. त्याचीच री ओढत श्रेयस अय्यर व केएल राहुल यांनी देखील हा कारनामा करून दाखवला.
वनडे विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी पहिल्या पाचही फलंदाजांनी अर्धशतक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी केवळ तीन फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती.
(This is the first time the first 5 batters have scored 50+ in an innings India Did Against Netherlands)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! ‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा
CWC 23: बंगळुरूत रोहित ‘टॉस का बॉस’, अखेरच्या सामन्यात दोन्ही संघात कुठलाच नाही बदल