श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला. पाहुण्या श्रीलंकन संघाने शेवटच्या टी-20 सामन्यात 91 धावांनी पराभव स्वीकारला आणि मालिका देखील गमावली. सूर्यकुमार यादव याने या सामन्यात वादळी शतक ठोकले आणि संघाच्या विजयात सर्वात महत्वाची भूमिका पार पाडली. सूर्याने अवघ्या 45 चेंडू शतक पूर्ण केले असून नाबाद 112 धावां कुटल्या. सामना संपल्यानंतर सूर्यकुमारने खास प्रतिक्रिया दिली.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) सध्या भारतीय क्रिकेट संघाचा महत्वाचा फलंदाज बनला आहे. सूर्या सध्या 32 वर्षांचा असून त्याला आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणासाटी मोठी वाट पाहावी लागली. जलै 2021 मध्ये त्याने अखेर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून भारतासाठी टी-20 पदार्पण केले. शनिवारी (7 जानेवारी) त्याने श्रीलंकेविरुद्धच्याच टी-20 सामन्यात शतक ठोकले आणि काही खास विक्रम देखील नावावर केले. टी-20 कारकिर्दीतील हे त्याचे तिसरे शतक असून रोहित शर्मानंतर भारतासाठी अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमारच्या वादळी शतकाच्या जोरावर शनिवारी भारताने श्रीलंकन संघाला मात दिली.
सामना संपल्यानंतर सूर्या म्हणाला की, “भारतीय संघाची पदार्पणाची कॅप मिळवण्यासाठी खूप वाट पाहावी लागली. यामुळेच माझी धावांची भूक वाढली आहे.” सूर्यकुमारने या सामन्यात मैदानाच्या चैफेर बाजूंना फटकेबाजी केली. फलंदाजी पाहून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. पण सूर्यकुमारसाठी ही फलंदाजी आणि अशा प्रकारचे शॉट्स यात काहीच विषेश नाहीये. सूर्याने या खेळीत बहुतांश शॉट्स मैदानाच्या मागच्या बाजूला खेळले असून तो म्हणाला, “मागची सीमा 59-60 मीटर लांब होती. त्यामुळे मी तिथे शॉट्स खेळत होतो. यातील काही शॉट्स आधीपासून ठरलेले होते. पण इतर काही शॉट्ससाठीही तयार राहावे लागते. द्रिवडने मला सामन्याचा आनंद घ्यायला सांगितले होते.”
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 228 धावा केल्या. प्रत्यत्तरात श्रीलंका संघ 16.4 षटकांमध्ये 137 धावा करून सर्वबाद झाला. टी-20 मालिका संपल्यानंतर आता उभय संघात तीन सामन्यांची वनेड मालिका खेळली जाईल. वनडे मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारी रोजी खेळला जाईल. (‘This’ is the reason behind Suryakumar’s storming century, revealed after winning the T20 series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषक खेळण्याचे रिषभचे स्वप्न भंगणार? ऑपरेशननंतर समोर आली नवी माहिती
आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम