भारतीय संघाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिवसेंदिवस त्यांच्या प्रदर्शनात सुधार केला आला आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने १९८३ साली पहिला विश्वचषक जिंकला. त्यानंतर पुन्हा एकदा २०११ मध्ये विश्वचषक जिंकला. त्याव्यतिरिक्त भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्राॅफीही जिंकली आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये संयुक्त विजेताही राहिला आहे. भारतीय संघाच्या या यशामागे संघातील दिग्गज खेळाडूंचा हात राहिला आहे. एकदा दिग्गज खेळाडू संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी कसलीच कसर सोडत नाही. मात्र, त्यांना योग्य वेळी संधी मिळणेही गरजेचे असते.
भारतीय संघात असे अनेक फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीत किंवा खालच्या फळीत फलंदाजी केली. मात्र, नंतर ते संघासाठी दमदार सलामीवीर बनले. या फलंदाजांनी मिळालेल्या संधीचे सोने केले आणि जगातल्या दिग्गज सलामीवीरांच्या यादीत सहभागी झाले. या लेखात अशाच तीन भारतीय खेळाडूंचा उल्लेख केला गेला आहे, ज्यांनी त्यांच्या करकिर्दीची सुरुवात मधल्या किंवा खालच्या फळीत फलंदाजी करून केली होती, पण ते पुढे जाऊन ते महान सलामीवीर बनले.
भारतीय संघात मधल्या किंवा खालच्या फळीत खेळून नंतर संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडलेले तीन दिग्गज फलंदाज-
१. सचिन तेंडुलकर
सचिनने त्याच्या वनडे कारकिर्दीची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध गुजरांवालामधील सामन्यातून केली होती. त्याला या सामन्यात पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवले गेले होते. तो या सामन्यात काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता आणि शून्य धावांवर बाद झाला होता. तो संघासाठी चार वर्षे मधल्या फळीत खेळला होता आणि त्यानंतर त्याला न्यूझीलँडविरुद्ध पहिल्यांदा सलामीवीराची भूमिका पार पाडण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने ४९ चेंडूत ८२ धावा केल्या होत्या आणि पुढे क्रिकेटमधील महान सलामीवीर बनला.
२. वीरेंद्र सेहवाग
वीरेंद्र सेहवाग त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एक गोलंदाजाच्या रूपात जास्त ओळखला जायचा. त्याला शेवटी गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी ठेवले जायचे. पाकिस्तानविरुद्ध सेहवागने १९९९ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात त्याला ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले गेले होते. त्या सामन्यात सेहवाग दोन चेंडूत एक धाव करून शोएब अख्तरच्या चेंडूवर बाद झाला होता. पुढे ११ सामन्यात तो याच क्रमांकावर खेळत राहिला.
अखेर त्याला त्याच्या बाराव्या सामन्यात न्यूझीलँडविरुद्ध पहिल्यांदा सलामीवीराची भूमिका दिली गेली होती. त्यानंतर त्याने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत सलामीवीराच्या रूपात चांगले नाव केले आणि भारताच्या दिग्गज सलामीवीरांच्या यादीत सामील झाला.
३. रोहित शर्मा
रोहितने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात २००७ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने केली होती. या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. ही तिरंगी मालिका होती आणि मालिकेतील पुढचा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध होता. या सामन्यात रोहीत सातव्या क्रमांकावर खेळला आणि आठ धावा करून परतला. यानंतर काही वर्ष तो खालच्या फळीतच खेळला. २०११ मध्ये त्याला एमएस धोनीने सलामीला पाठवले. तेथे त्याला जास्त यश मिळाले नाही. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत धोनीने त्याला पुन्हा सलामीसाठी पाठवले आणि यावेळी रोहितने चांगली कामगिरी केली. यावर्षी त्याने सलामीवीराच्या भूमिकेत १६ डावांमध्ये ५८० धावा केल्या. आज रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सलामी फलंदाज आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे एक मोठे नाव आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एवढा भारी रेकाॅर्ड आता जेम्स अँडरसनच्या नावावर झालाय, आधी सचिनचं होतं ‘या’ विक्रमावर राज्य
ओव्हल कसोटीत भारतीय संघ उतरला दंडाला काळी पट्टी बांधून; ‘हे’ आहे कारण
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला होते क्रिकेटचे प्रचंड वेड, पाहा त्याच्या तुफान फटकेबाजीचा व्हिडिओ