---Advertisement---

गब्बरने सांगितले निराशेतून बाहेर येण्याचे गुपित; म्हणाला, “या गोष्टी आयुष्यात…”

dhawan delhi
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind odi series) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बुधवारी (१९ जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ३१ धावांनी विजय मिळवला. भारताचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन (shikhar dhavan) बऱ्याच दिवसांना भारताच्या जर्सीमध्ये मैदानात दिसला. संघात पुनरागमन करत त्याने ७९ धावांची महत्वपूर्ण खेळी देखील केली. सामना संपल्यानंतर मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर राहिल्यानंतर आता पुनरागमन करणाऱ्या धवानला अनेक प्रश्न विचारले गेले. यावेळी त्याने खास प्रतिक्रिया दिली.

धवन संघातून बाहेर असताना त्याच्याविषयी अनेक प्रकारच्या बातम्या आणि चर्चा समोर आल्या होत्या. अशा परिस्थितीत खेळाडू निराश होणे अपेक्षितच असते. यासंदर्भात प्रश्नाचे उत्तर देताना धवन म्हणाला की, “मी मीडियाचे ऐकत नाही. मी वृत्तपत्र वाचत नाही आणि बातम्या पाहत देखील नाही. अशाप्रकारे मला ही सर्व माहिती मिळत नाही.”

तो पुढे म्हणाला की, “मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे की, माझा खेळ कसा आहे. याविषयी माझे विचार स्पष्ट आहेत. मी नेहमी शांत राहतो. हा जीवनाचा भाग आहे, आयुष्यात असे होत असते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. त्यामुळे माझ्यासाठी काहीच नवीन नाहीये. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा किंवा शेवटच्या वेळेस असे झाले नाही. असे होत असते. या गोष्टी मला मजबूत बनवतात.”

“अशा गोष्टी नेहमी होत असतात आणि मला त्यांची सवय आहे. मला फक्त एवढे माहिती आहे की, मला माझे सर्वश्रष्ठ प्रदर्शन करायचे आहे. यानंतर सर्व गोष्टी मी देवावर सोडतो. मला माझ्या अनुभवामुळे आणि आत्मविश्वासामुळे माहीत होते की, मी चांगले प्रदर्शन करील. मला आनंद आहे की, मी आज चांगली खेळी केली. मी जोपर्यंत क्रिकेट खेळत आहे, तोपर्यंत स्वस्थ आणि फिट राहावे लागेल आणि सतत धावा कराव्या लागतील.” असे धवन पुढे बोलताना म्हणाला.

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. धवनच्या मते रोहितने पुनरागमन केल्यानंतर संघ अधिक मजबूत होईल. तो म्हणाला की, “आता रोहित संघात नाही. जेव्हा तो पुनरागमन करेल, तेव्हा एका अनुभवी खेळाडू संघात येईल आणि मध्यक्रमदेखील मजबूत होईल. ज्या युवा खेळाडूंना संधी मिळत आहे, त्यांना अनुभव मिळेल. आम्ही याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहोत.”

महत्वाच्या बातम्या –

पुढील ३ हंगामांसाठी मुंबई इंडियन्समध्ये ‘या’ सदस्याची झाली एन्ट्री; खेळाडूंनीच करून दिली ओळख

आक्रमक फलंदाजी अन् हटके शॉट! चाहते म्हणाले, हा भविष्यातील ‘मिस्टर ३६०’, पाहा कोण आहे तो फलंदाज

अखेर अब्रू राखली! आयसीसी २०२१ कसोटी संघात ‘भारतीय त्रिमूर्ती’ सामील; विलियम्सनकडे नेतृत्व

व्हिडिओ पाहा –

२०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही | India's Unsung heroes of 2011WC

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---