---Advertisement---

गाडी क्रमांक १५५२…! विजयानंतरही मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून ‘आऊट’, चाहत्यांकडून मीम्सचा वर्षाव

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या साखळी फेरी सामन्यांचा टप्पा शुक्रवार रोजी (०८ ऑक्टोबर) संपला. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या रुपात प्लेऑफमधील पहिले ३ पात्र संघ मिळाल्यानंतर चौथ्या स्थानावरही कोलकाता नाईट रायडर्सने ताबा मिळवला होता. तरीही मुंबई इंडियन्सने त्यांच्या शेवटच्या साखळी फेरी सामन्याद्वारे चौथ्या स्थानासाठी आपली दावेदारी ठोकण्याचा प्रयत्न केला.

त्यांचा अंतिम साखळी फेरी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अबु धाबीच्या मैदानावर झाला असून हंगामातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत विजय मिळवल्यानंतरही ते प्लेऑफसाठी पात्र ठरलेले नाहीत. यानंतर आयपीएलप्रेमींच्या सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात झालेल्या आयपीएल २०२१ मधील ५५ व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाला २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या मोबदल्यात १९३ धावाच करू शकला. अशाप्रकारे मुंबईने ४२ धावांनी हा सामना जिंकला.

मुंबईला कोलकात्याला मागे टाकल प्लेऑफमध्ये धडक मारण्यासाठी १७० पेक्षा जास्त धावांनी सामना जिंकण्याची आवश्यकता होती. परंतु हैदराबादच्या खेळाडूंनी त्यांच्या या आशेवर पाणी फेरले. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. मुंबईच्या खेळाडूंच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. तर काहींनी मीम्स शेअर करत त्यांना ट्रोल केले आहे.

येथे पाहा मीम्स आणि प्रतिक्रिया-

https://twitter.com/rider_provider7/status/1446555276094500869?s=20

https://twitter.com/avdhootZone/status/1446533426736078850?s=20

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, मुंबईकडून प्रथम फलंदाजी करताना इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रशंसनीय फलंदाजी केली. इशानने ३२ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ८४ धावा चोपल्या. तर सूर्यकुमारने मधल्या फळीत फलंदाजीला येत ८२ धावा फलकावर लावल्या. ४० चेंडूंमध्ये ३ षटकार आणि १३ चौकाराच्या मदतीने त्याने या धावा केल्या. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

मुंबईच्या २३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून प्रभारी कर्णधार मनिष पांडेने ६९ धावांची चिवट झुंज दिली. त्याने डावाखेर नाबाद राहत ६९ धावा केल्या. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे हैदराबादचा संघ १९३ धावांपर्यंत मजल मारू शकला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, नाथन कूल्टर नाईल आणि जिम्मी नीशमने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१ला मिळाले टॉप-४ संघ, ‘असे’ होतील प्लेऑफ आणि फायनलचे सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

टेबल टॉपर्सलाही चोपलं! दिल्लीविरुद्ध मॅक्सवेलचे झंझावाती अर्धशतक, मोठ्या विक्रमांची खात्यात भर

आशेला बुच, स्वप्नांचा चुराडा! हैदराबादच्या सलामवीरांच्या झंझावातामुळे मुंबई प्ले ऑफच्या शर्यतीतून ‘आऊट’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---