भारत आणि पाकिस्तान या कट्टर विरोधी देशांमध्ये टी२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) जंगी सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच भारतीय कर्णधार विराट कोललीने पाकिस्तानविरुद्ध एक चाल खेळली आहे. विराटने शनिवारी पत्रकार परिषदेत सामन्याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्याने या सामन्यासाठी असलाही अतिरिक्त दबाव नसल्याचे आणि कोणतीही खास प्लॅनिंग केले नसल्याचे सांगितले आहे.
स्टेडियमधील वातावरण वेगळे असेल, पण त्यामुळे संघाच्या मानसिकतेवर आणि तयारीवर याचा कसलाही परिणाम होणार नाही, असेही यावेळी विराटने स्पष्ट केले.
पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट म्हणाला की, “यामध्ये कसलीही शंका नाही की, पाकिस्तान चांगला संघ आहे. त्यांच्यासोबत नेहमीच खडतर सामना असतो. आम्ही चांगले क्रिकेट खेळण्यावर लक्ष्य केंद्रीत करत आहोत.”
भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी प्रश्न विचारण्यात आल्यावर विराट म्हणाला की, “मी प्लेइंग इलेव्हनविषयी सध्या सांगत नाहिये, पण आमचा संघ संतुलित आहे.”
प्रत्येक सामन्यासाठी दोन्ही संघांची वेगवेगळी रणनीती तर असतेच. पण विराटच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय संघाने या सामन्यासाठी कसलीही विशेष रणनीती तयार केलेली नाही. विराटला सामन्याविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा विराटने सांगितले आहे की, वातावरण वेगळे असेल, पण त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यासाठी त्यांचा कोणतीच वेगळी योजना नाहिये.
दरम्यान, विराटने ज्याप्रकारे माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, त्यातुन त्याने पाकिस्तान संघाला विशेष महत्त्व दिला नसल्याचे दिसत आहे आहे. विराटने पाकिस्तान संघाला इतर संघांप्रमाणेच लेखले असल्याचे दिसते.
दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने भारताविरुद्धच्या सामन्यासाठी त्यांचे १२ खेळाडू घोषित केले आहेत. पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आजमकडे असेल. या संघात दिग्गज अष्टपैलू शोएब मलिकला संधी दिली गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सुरमा मार्करम! पहिल्याच सामन्यात टिपला नजरेचे पारणे फेडणारा झेल; पाहा व्हिडिओ
लाजवाब रशीद! दोन धावांत चार बळी टिपत बनवले विक्रमांचे इमले
टी२० विश्वचषक: इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर ऐतिहासिक विजय, गतविजेत्यांना ६ विकेट्सने दिला पराभवाचा धक्का