भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली जिंकलेला विश्वचषक कोणताच क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. आता या विश्वचषकाची पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी रनवीर सिंग (ranveer singh) याचा ‘८३’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेंक्षकांच्या पसंतीला पडत आहे. भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने देखील हा चित्रपट पाहिला आणि त्याचे कौतुक केले आहे. विराटने चित्रपटातील कलाकार आणि इतर कर्मचाऱ्यांचे देखील कौतुक केले आहे.
विराटने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून खास पोस्ट करत या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ट्वीटमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षण यापेक्षा चांगल्या पद्धतीने जगता आला नसता. ज्या ऐतिहासिक आणि १९८३ विश्वचषकातील भावनिक क्षणांवर हा चित्रपट बनला आहे, त्याला खूपच चांगल्या प्रकारे दाखवले गेले आहे. सर्वांनी चांगले काम केले.’
‘चित्रपटात रणवीर सिंगचा एक वेगळाच दर्जा पाहायला मिळाला आहे. सर्वांनी अप्रतिम काम केले’, असे विराटने पुढे लिहिले आहे. ट्वीटमध्येय त्याने १९८३ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव, रणवीर सिंग आणि चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांना मेंशन केले आहे.
@RanveerOfficial was a different level altogether. Great job everyone! @therealkapildev @kabirkhankk 👏
— Virat Kohli (@imVkohli) December 25, 2021
चित्रपटाचा विचार केला, तर हा १९८३ च्या विश्वचषकात भारतीय संघाने मिळवलेल्या जेतेपदावर आधारित आहे. भारतीय संघासाठी हा विश्वचषकातील त्यांचा पहिला विजय होता. कपिल देव त्यावेळी भारताचे नेतृत्व करत होते. रणवीर सिंगने या चित्रपटात कपिल देवचे पात्र साकारले आहे. त्याने कपिल देव यांची भूमिका खूपच उत्कृष्टपणे पार पाडल्याचे सांगितले जात आहे. चाहते हा चित्रपट पाहून आनंदी झाल्याचे दिसत आहेत.
‘८३’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचा एक खास प्रिमियर आयोजित केला गेला होता. यावेळी १९८३ विश्वचषकात भारतीय संघासाठी खेळलेले दिग्गज खेळाडूही उपस्थित राहिले होते. चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी काही भावनिक क्षण पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या –
मालिका विजयासाठी कांगारू सज्ज! अशी आहे ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन
राजकारणाच्या पिचवर उतरणार का हरभजन? स्वतः दिले उत्तर; म्हणाला…
व्हिडिओ पाहा –