दिल्ली। रविवारी(28 एप्रिल) फिरोजशहा कोटला स्टेडियमवर आयपीएल 2019 मधील 46 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने 16 धावांनी विजय मिळवला. याबरोबर आयपीएल 2019 च्या प्लेऑफमध्ये प्रवेशही निश्चित केला आहे.
पण या सामन्याआधी नाणेफेकीवेळी एक मजेशीर गोष्ट क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळाली.
झाले असे की रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आयपीएल 2019मध्ये 12 नाणेफेकीपैकी 9 व्यांदा नाणेेफेक हरला. पण यावेळी त्याने याचे सेलिब्रेशन करताना हातवारे करत 9 वेळा नाणेफेक हरल्याचे सांगितले. तो ही मजेशीर कृती करताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर अंजूम चोप्राबरोबर बोलत होता.
यासामन्यात दिल्लीने शिखर धवन(50) आणि कर्णधार श्रेयस अय्यरने(52) केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 187 धावा केल्या होत्या. त्यानंतर 188 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरला मात्र 20 षटकात 7 बाद 171 धावाच करता आल्या.
Lost 9 out of 11 tosses. Toss lo neeku chaladaridram vundi virat annnaaa. …. King kohli daaaa pic.twitter.com/JQVHZMpy75
— Manikanta Swami (@Manikan77884196) April 28, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला झाला मोठा दंड, जाणून घ्या कारण
–बेंगलोरचा पराभव करत ७ वर्षांनंतर दिल्लीने आयपीएलमध्ये केला तो कारनामा