भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रविवारी कोलंबो येथील आर प्रेमदासा या स्टेडियमवर खेळण्यात आला. भारताच्या वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय ब संघाला श्रीलंका दौऱ्यावर पाठवले आहे. परंतु या संघांमध्ये देखील शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या सारखे वरिष्ठ खेळाडू आहेत.
याच या मालिकेची सुरुवात होण्यापुर्वी श्रीलंकेचे विश्वचषक विजेता संघाचे कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी भारतीय संघावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. परंतु आता पहिल्या वनडेत भारताने श्रीलंकेला ७ विकेट्सने धोबीपछाड दिल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने रणतुंगा यांना सणसणीत चपराक लगावली आहे.
रणतुंगा म्हणाले होते की, “भारताच्या ब संघाला श्रीलंकेला पाठवणे हा श्रीलंका बोर्डाचा अपमान आहे. मनोरंजनाच्या गरजा भागविण्यासाठी त्यांच्याबरोबर खेळण्याचे मान्य केल्याबद्दल मी सध्याच्या प्रशासनाला दोष देतो. हा भारताचा दुसऱ्या दर्जाचा संघ आहे.”
आतापर्यंत कोरोनामुळे बर्याच मालिका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताविरुद्धची मालिका श्रीलंकेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. याद्वारे ब्रॉडकास्टरकडून मंडळाला सुमारे 90 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच एका सामन्यासाठी सुमारे 15 कोटी रुपये मिळणार आहेत.
यासंदर्भात क्रिकबजसोबत बोलत असताना वीरेंद्र सेहवागने रणतुंगांच्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिले आहे. सेहवाग म्हणाले की, “श्रीलंका बोर्डाने भारतीय संघाचे आभार मानायला हवे. भारताचा संघ कोरोनाच्या समस्येमध्येही दौरा करण्यास नकार देऊ शकतो. पण त्यांनी असे केले नाही. भारतीय संघामुळे श्रीलंका बोर्ड व खेळाडूंना पैसे मिळणार आहेत.”
हा संघ इंग्लंडला पण पराभूत करू शकतो
माजी क्रिकेटपटू सेहवाग पुढे म्हणाले की, “तुम्ही भारतीय भारताच्या कोणत्याही संघाला दुसऱ्या दर्जाचा संघ म्हणू शकत नाही. इंडियन प्रीमियर लीगमुळे भारताला उत्कृष्ट युवा खेळाडू मिळाले आहेत. जर या संघाला सध्याच्या इंग्लंड संघासोबत देखील खेळायला पाठवले, तर हा संघ इंग्लंड संघाला पराभूत करून येईल.”
समालोचक आकाश चोप्राने म्हटले होते की, “श्रीलंका संघाला अजून टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरायचे आहे. पण भारतीय संघ पात्र ठरला आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या सध्याच्या स्थितीला पाहता भारताचा ब संघ देखील खूप चांगला आहे.”
श्रीलंका बोर्डानेही रणतुंगांच्या वक्तव्याचा केला होता विरोध
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अर्जुन रणतुंगा यांच्या भाष्याला विरोध दर्शवला होता. त्यांनी म्हटले होते की, “भारतीय संघामध्ये चांगले खेळाडू आहेत आणि ते येथे येत आहेत याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या-
बड्डेदिवशी मुलगा ईशानचे वनडेत अविस्मरणीय पदार्पण, वडिलांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
महागुरु द्रविडचे मार्गदर्शन लाभलंय, मग चांगल्या फॉर्ममध्ये तर येणारच; पाहा कोण म्हणालं असं
हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर ‘कोच’ द्रविडने दिली होती का काही प्रतिक्रिया? पृथ्वी शॉने केला खुलासा