नवी दिल्ली। जेव्हाही भारतीय घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची चर्चा होते, तेव्हा भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरचे नाव आवर्जुन घेतले जाते. मुंबईचा दिग्गज फलंदाज, जो नंतरच्या काही वर्षांमध्ये विदर्भ संघाचा चेहरा बनला होता, त्याच्या नावावर घरगुती क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आहेत.
जाफरने ३१ कसोटी आणि २ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने कसोटीत ३४.१० च्या सरासरीने १९४४ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतकेही ठोकली आहेत. त्याचबरोबर त्याने वनडेत केवळ १० धावा केल्या आहेत.
परंतु घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करूनही तो संघातून वगळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात अयशस्वी ठरला. याबाबत त्याने नुकतीच चर्चा केली आहे.
तो म्हणाला, “२०१२- १३ मध्ये मी शिखर धवनच्या निवडीसोबत आपलीही निवड होण्याच्या खूप जवळ होतो. परंतु ते शक्य झाले नाही. निवडकर्ताच ते लोक आहेत, जे याचे सर्वोत्तम उत्तर देऊ शकतात. परंतु मी निश्चितच प्रयत्न करत राहिलो.”
‘सातत्य राहिले असते, तर १०० कसोटी सामने खेळलो असतो’
जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २६० सामने खेळताना ५०.६७ च्या सरासरीने १९४१० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद ३१४ इतकी आहे. त्याने या धावा करताना ५७ शतकेही ठोकली आहेत. परंतु असे असले तरी, जाफरला वाटते की तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्य कमी राखल्यामुळे झगडत राहिला.
तो म्हणाला, “मी सातत्य ठेवले नव्हते. जर मी सातत्य ठेवले असते, तर नक्कीच १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले असते. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने कामगिरी करू शकलो नाही. त्यामुळे मला पराभव मिळाला.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “मी जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे, त्यापेक्षा अधिक मी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कारकिर्दीसाठी प्रसिद्ध आहे.”
घरगुती हंगाम असा असायला पाहिजे
वेदांत शर्माद्वारे आयोजित केलेल्या स्पोर्ट्स टायगरचा कार्यक्रम ‘ऑफ द फिल्ड’ वर नुकत्याच झालेल्या चर्चेत जाफरने उत्तराखंडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, “हे खूप रोमांचक आहे तसेच असे काही जे माझ्यासाठी नवीन आहे.”
भारतीय घरगुती क्रिकेट हंगामाबद्दल बोलताना तो म्हणाला, “इतर देशांच्या तुलनेत मला वाटते आपल्या घरगुती क्रिकेटची संरचना वाईट नाही. आपल्याला केवळ थोडीशी सातत्यता राखण्याची गरज आहे. कारण प्रत्येक वर्षी आपण संरचना बदलत असतो.”
जाफर म्हणाला, “मला वाटते की हंगामाची सुरुवात ऑक्टोबरमध्ये रणजी ट्रॉफीने व्हायला पाहिजे. यानंतर इराणी ट्रॉफी झाली पाहिजे आणि त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जसे एक टी२० स्पर्धा ठेवली जाऊ शकते. कारण हा वेळ असतो, जेव्हा लिलाव होत असतो. अनेक फ्रंचायझीचे लोक स्पर्धा पाहू शकतात आणि नवीन प्रतिभावान खेळाडूंची निवड करू शकतात. शेवटी विजय हजारे ट्रॉफीसोबत हंगाम संपविला पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय गोलंदाज म्हणतोय, माझी बायकोसुद्धा आहे या अवॉर्डची दावेदार
-अश्विन पाँटिंगसोबत फोनवर नेमकं काय बोलला? यावेळी होणार खुलासा
-भल्या भल्यांना न जमणारा कीर्तिमान विराट केला स्थापित, बनला पहिलाच आशियाई सेलिब्रिटी
ट्रेंडिंग लेख-
-दोन दुर्दैवी फलंदाज जे आयपीएलमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद
-या खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी, तीन भारतीयांचाही समावेश
-आयपीएल २०२०: अशी ४ कारणं, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला मिळू शकते ५ वे आयपीएल विजेतेपद