१९८७ मध्ये अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक कसोटी सामना खेळला गेला होता. या कसोटी सामन्यात भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांनी कसोटी कारकिर्दीत १०,००० धावा करत नवीन इतिहास रचला होता. या ऐतिहासिक कसोटी सामन्यादरम्यान एक रोमांचक घटनाही पहायला मिळाली.
अहमदाबाद कसोटीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजीजी करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी अत्यंत संथ गतीने फलंदाजी केली. म्हणूनच जेव्हा पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा पाकिस्तानने ८६ षटकांत केवळ १३० धावा केल्या होत्या.
दुसर्या दिवशीही पाकिस्तानच्या फलंदाजांनी संथ फलंदाजी केली. त्यामुळे पाकिस्तान पहिला डाव तिसर्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत चालला. ज्या प्रकारे पाकिस्तानच्या फलंदाजांनी संथ फलंदाजी केली. त्यामुळे भारतीय चाहते चांगलेच संतापले होते.
पाकिस्तानची फलंदाजी पाहून भारतीय चाहत्यांनी हा आरोप करण्यास सुरुवात केली, की पाकिस्तानने जाणीवपूर्वक सामना अनिर्णित करण्यासाठी संथ गतीने फलंदाजी केली. तिसर्या दिवसाच्या दुसर्या सत्रात भारतीय संघाला आपला पहिला डाव सुरू करण्याची संधी मिळाली. कसोटीत १०,००० धावा पूर्ण करण्यासाठी सुनील गावसकरला अवघ्या ५८ धावांची गरज होती.
भारतीय चाहत्यांनी केली पाकिस्तानच्या खेळाडूंवर जोरदार टीका
जेव्हा पाकिस्तान संघ मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी उतरला. तेव्हा भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांवर पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरवात केली आणि आक्रमक पद्धतीने वाद घालण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या फलंदाजांनी हळू फलंदाजी केल्याबद्दल भारतीय चाहत्यांना प्रचंड राग आला होता.
भारतीय चाहत्यांच्या अशा वागणुकीमुळे पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खान (Imran Khan) संतापला आणि त्याने तातडीने आपल्या सहकारी क्रिकेटपटूंना पव्हेलियनमध्ये जाण्यास सांगितले. खेळ सुमारे ५० मिनिटे थांबला. अशा परिस्थितीत भारतीय दिग्गज गावसकर (Sunil Gavaskar) आणि कपिल देव (Kapil Dev) यांनी चाहत्यांना गोंधळ न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.
इम्रान खानने क्षेत्ररक्षकांना दिला हेल्मेट घालण्याचा सल्ला
जेव्हा पाकिस्तान संघ पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी परत आला, तेव्हा पाकिस्तानी कर्णधार इम्रानने आपल्या क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर हेल्मेट घालून क्षेत्ररक्षण करण्यास सांगितले. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना हेल्मेट घालण्यात आले होते.
इजाज फकीह (Ijaz Faqih) आणि युनूस अहमद (Younus Ahamad) या दोन्ही फलंदाजांनी सामन्यात शतके ठोकली होती. पण हळू- हळू फलंदाजी केल्यामुळे या रोमांचक कसोटी सामन्याची अपेक्षा बाळगणाऱ्यांना निराशाजनक सामना पाहण्यास मिळाला. या दोन पाकिस्तानी फलंदाजांबद्दल भारतीय चाहत्यांचा विशेष राग होता. यामुळेच चाहत्यांनी आपला संताप व्यक्त करण्यास सुरवात केली होती.
गावसकरांनी केला विश्वविक्रम
या सामन्यात सुनील गावसकरांनी ६३ धावा केल्या आणि दिलीप वेंगसरकर यांनी (Dilip Vengaskar) शतकी खेळी करून चाहत्यांना मोठा दिलासा दिला. गावसकरांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत १०,००० धावा पूर्ण करून चाहत्यांना एक अविस्मरणीय आठवण दिली. पाकिस्तानी गोलंदाज इजाज फकीहच्या चेंडूवर लेट कट खेळत गावसकरांनी एक धाव घेत कारकिर्दीच्या १०,००० धावा पूर्ण केल्या.
गावसकरांनी १२२ कसोटी सामन्यात २१२ व्या डावा दरम्यान १०,००० धावा पूर्ण केल्या होत्या.हा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. पाकिस्तानविरूद्ध हा भारताचा ११ वा कसोटी सामना होता जो अनिर्णित राहिला होता. पण गावसकरांच्या विक्रमामुळे हा कसोटी सामना ऐतिहासिक झाला.
सामना स्कोर कार्ड:
पाकिस्तानचा पहिला डाव: ३९५-१०, इजाज फकीह- १०५
भारताचा पहिला डाव: ३२३-१०, सुनील गावसकर- ६३, दिलीप वेंगसरकर- १०९
पाकिस्तानचा दुसरा डाव: १३५-२, सामना अनिर्णित राहिला
ट्रेंडिंग घडामोडी-
-अरे माझी कोरोना टेस्ट तर निगेटिव्ह; पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचे खळबळजनक ट्विट
-पुढच्या वर्षी भारतात येणार पाकिस्तान टीम, पीसीबीने भारताकडे मागितलं लिखीत आश्वासन