इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे वेध लागले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही या सामन्यासाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साउथम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना होणार आहे. तर कसोटी मालिकाही इंग्लंडच्या मैदानावरच खेळवली जाणार आहे.
या संघात वेगवान गोलंदाजी विभागात मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. परंतु अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला या संघात सहभागी करण्यात आले नाही.
दुखापतीतून सावरल्यानंतर भुवनेश्वर भारत विरुद्ध इंग्लंड वनडे आणि टी२० मालिकेत दमदार प्रदर्शन केले होते. याबरोबरच इंग्लंडच्या मैदानांवरील त्याची कामगिरीही उल्लेखनीय राहिली आहे. तरीही संघ निवकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास न दाखवल्याने सर्वांनाच आश्चर्य झाले आहे.
भुवनेश्वरची कामगिरी इशांत, शमी आणि बुमराहवरही भारी
भुवनेश्वरच्या इंग्लंडच्या मैदानांवरील कसोटीतील आकडेवारींवर नजर टाकायची झाली तर, त्याने आतापर्यंत ५ सामने खेळताना १९ विकेट्स घेतल्या आहेत. २६.६३ च्या गोलंदाजी सरासरी आणि ५४.५ च्या स्ट्राईक रेटने त्याने या विकेट्स चटकावल्या आहेत. दरम्यान ८२ धावांवर ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी राहिली आहे. याबरोबरच २ वेळा एकाच डावात ५ विकेट्स घेण्याच्या किर्तीमानाचाही यात समावेश आहे.
हेच इशांत शर्मा (पहिल्या) आणि मोहम्मद शमी (दुसऱ्या) हे इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या सक्रिय गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वरच्या (तिसऱ्या) पुढे आहेत. इशांतने १२ सामन्यात ४३ विकेट्स घेतल्या आहेत. परंतु त्याची गोलंदाजी सरासरी आणि स्ट्राईक रेट भुवनेश्वरपेक्षा खराब आहे. त्याने ३४ च्या गोलंदाजी सरासरीने आणि ६१ च्या स्ट्राईक रेटने इंग्लंडमध्ये कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. तर शमीही ८ सामन्यात २१ विकेट्स घेत भुवनेश्वरच्या पुढे आहे. परंतु त्याचा स्ट्राईक रेट ७७ इतका आहे. सोबतच त्याला एकदाही विकेट्सचा पंच घेतला आला नाही.
जसप्रीत बुमराहविषयी बोलायचे झाले तर, तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या सक्रिय गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वरपेक्षा मागे आहे. त्याने ३ कसोटी सामने खेळताना १४ विकेट्सची कामगिरी केली आहे. परंतु या तिन्ही गोलंदाजांपेक्षा भुवनेश्वरपेक्षा स्ट्राईक रेट जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियात झाली अर्झन नागवासवालाची एंट्री, तब्बल ४६ वर्षांनंतर घडला ‘हा’ इतिहास