भारत आणि बांग्लादेश यांच्यात नुकत्याच झालेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने शानदार कामगिरी करत 2-0 असा एकतर्फी विजय मिळवला. या दरम्यान संपूर्ण मालिकेत भारतीय खेळाडूंची कामगिरी कमालीची होती. विशेषत: क्षेत्ररक्षणात भारतीय खेळाडूंनी आपले 100 टक्के दिले आणि बांगलादेशला रोखले. भारतीय खेळाडूंनी अनेक उत्कृष्ट झेलही घेतले. अशा परिस्थितीत मालिका संपल्यानंतर भारतीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंचे कौतुक केले आणि दोन खेळाडूंना “इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सिरीज” पदकही बहाल केले.
आपल्या भाषणा दरम्यान टी दिलीपने खेळाडूंचे कौतुक केले. विशेषतः स्लिप क्षेत्ररक्षण आणि जवळचे झेल यांचा उल्लेख केला. साहजिकच फलंदाजाच्या जवळ उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला कॅच पकडण्यासाठी किंवा चेंडू समजून घेण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. असे असतानाही भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
???????????????????????????????? ???????????????? ???????????? | ???????????????????????? ???????????????????????????? ???????? ???????????? ????????????????????????
Sharp grabs, one-handed catches and terrific fielding remained constant throughout the #INDvBAN series!
???? Find out who won the fielding ???????? – By @RajalArora #TeamIndia | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 2, 2024
टी दिलीप म्हणाले, “चेन्नईतील ओलसर खेळपट्टी असो किंवा कानपूरमधील हवामानाची समस्या असो, सर्व खेळाडूंनी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाच्या अर्ध्या संधींचे सामन्यात बदल घडवून आणले ते अत्यंत प्रशंसनीय आहे. सरतेशेवटी, टी दिलीपने मोहम्मद सिराजच्या शानदार क्षेत्ररक्षणासाठी आणि बॅकवर्ड झेल आणि यशस्वी जयस्वालचा झाकीर हसनचा स्लिपमध्ये घेतलेला शानदार झेल यासाठी संयुक्तपणे “इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सिरीज” पदक बहाल केले. यावेळी सिराज आणि जयस्वाल यांनी एकमेकांना पदके दिली.
बांग्लादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत यशस्वी जयस्वालची बॅट शांत राहिली. मात्र कानपूरमध्ये जयस्वालने आपली टी20 स्टाईल दाखवत बांग्लादेशी गोलंदाजांना तंबी दिली. यादरम्यान यशस्वीने पहिल्या डावात 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 चेंडू खेळून शानदार 72 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात यशस्वीने आपली लय कायम ठेवत 45 चेंडूत 51 धावांची उत्कृष्ट खेळी केली. यामुळे भारताने बांग्लादेशला क्लीन स्वीप करत मालिका जिंकली.
हेही वाचा-
शतक थोडक्यात हुकलं, पण संघासाठी संकटमोचक बनून आला अजिंक्य रहाणे!
WTC इतिहासात रोहित शर्माचा किर्तीमान, सहकारी कोहलीचा विक्रम मोडून बनला दिग्गज कर्णधार
हत्येचा गुन्हा असलेला शाकिब बांगलादेशात परतणार नाही? या देशात स्थायिक होण्याची शक्यता






